AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा उत्पादक शेतकरी धोरणात भरडला; आता बांगलादेशाच्या या निर्णयामुळे वाढली डोकेदुखी

Import duty on Onion : कांद्याचे निर्यात शुल्क 20 टक्के असतानाच आता बांगलादेशाने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे कांद्याचे बाजार भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

कांदा उत्पादक शेतकरी धोरणात भरडला; आता बांगलादेशाच्या या निर्णयामुळे वाढली डोकेदुखी
| Updated on: Jan 17, 2025 | 12:21 PM
Share

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून निर्यात शुल्काबाबत दिलासा मिळालेला नाही. कांद्याचे निर्यात शुल्क 20 टक्के असतानाच आता बांगलादेशाने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे कांद्याचे बाजार भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. आता केंद्र सरकारने तातडीने पावलं टाकण्याची मागणी केल्या जात आहे.

काय आहे निर्णय?

बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयात करणारा देश आहे. गेल्या वर्षात 20 टक्के तर त्यापूर्वी 17 टक्के कांद्याची निर्यात एकट्या बांगलादेशात झाली होती. आता बांगलादेशातील कांदा सुद्धा बाजारपेठेत येत आहे. या कांद्याला संरक्षण मिळावे आणि स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे यासाठी बांगलादेशाने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. 17 जानेवारी म्हणजे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बांगलादेशाच्या निर्णयामुळे भारतीय कांदा उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तेथील कांदा बाजारात येत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बांगलादेशाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी होत आहे. अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये कांद्याचे बाजार भाव कोसळण्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण

दरम्यान या निर्णयाचे पडसाद आता उमटत आहेत.चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता २,२०० रुपयांच्या आत आले असल्याने शेतकरी अडचणी आला आहे , कांदा निर्यातीवरील केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे निर्यातीसाठी व्यापारी वर्गाकडून अनास्था व नवीन कांदा बाजारात आल्याने कांद्याची मोठ्या प्रमाणात अवाक वाढली आल्याने कांद्याचे दरात घसरण झाली आहे. भारतीय कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी होत आहे. अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये कांद्याचे बाजार भाव कोसळण्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार