AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात’; निशाणा देशातील सर्वात मोठ्या नेत्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करताना नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र हा भटकती आत्म्यांचा शिकार बनलाय, असं म्हटलं.

'महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात'; निशाणा देशातील सर्वात मोठ्या नेत्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Apr 29, 2024 | 8:23 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि पुणे जिल्ह्यातील महायुतीचे इतर उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अतिशय खोचक शब्दांमध्ये विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात, अशी टीका नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केली.

“महाराष्ट्राने खूप काळ राजकीय अस्थिरता पाहिली आहे. मी आज काही सांगण्याआधी स्पष्ट करु इच्छितो की, कुणीही आपल्या डोक्यावर टोपी घेऊ नका. आमच्याइकडे म्हणतात की, काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले असतात, अशा आत्मा भटकत असतात. मग स्वत:चं काम झालं नाही तर इतरांचं काम बिघडवण्यातही त्यांना मजा येते. आमचा महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

‘इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी…’

“आजपासून 45 वर्षांपू्र्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या मार्गावर गेलं. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. विपक्ष सरकार अस्थिर करत नाहीत. तर या आत्माच काहीतरी करतात. ते आपल्या पक्षातही असंच काहीसं करतात. या आत्मा कुटुंबातही तसंच करतात”, असा घणाघात शरद पवारांनी केला.

“1995 मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार आलं तेव्हाही या आत्म्याने ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये या आत्माने जनादेशाचा अपमान केला. ते महाराष्ट्राची जनता जाणते. विशेष म्हणजे आज देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज भारताला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचवून देशाला स्थिर, मजबूत सरकारची आवश्यकता आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. महाराष्ट्रात आमची महायुती आहे, ती मजबुतीने इतकी पुढे जावी की, गेल्या 35 ते 40 वर्षात ज्या कमतरता राहिल्या आहेत, त्या पूर्ण भरुन काढतील, आणि विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.