AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown: कोरोनामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; पुण्यातील व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम

गेल्याच आठवड्यात पुण्यातील व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला होता. | Maharashtra Lockdown

Maharashtra Lockdown: कोरोनामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; पुण्यातील व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम
पुण्यातील दुकाने बंद
| Updated on: Apr 13, 2021 | 8:58 AM
Share

पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभे असताना आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. ठाकरे सरकारने लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय लवकर जाहीर केला नाही तर आम्ही दुकानं उघडू, असे पुण्यातील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. (Shopkeeper and traders association stand on Lockdown in Maharashtra)

त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू झाला तर पुण्यातील व्यापारी त्याला पाठिंबा देतील. मात्र, संपूर्ण लॉकडाऊन नसेल तर आम्ही बुधवारपासून दुकाने उघडू, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे आता उद्यापर्यंत पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

गेल्याच आठवड्यात पुण्यातील व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला होता. तेव्हाही कोणत्याही परिस्थितीत दुकानं उघडणार, असा पवित्रा या व्यापाऱ्यांनी घेतला होता. तेव्हा पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासन विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उद्भवण्याची भीती होती. मात्र, तेव्हादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतले होते.

महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रात अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्यात आला होता. या लॉकडाऊनंतर अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृतांचा आकडा कमी झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्राला कोरोनाच्या भीषण तडाख्यातून वाचवण्यासाठी आता ठाकरे सरकार अमरावती पॅटर्नच्या लॉकडाऊनची तयारी करत असल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown: ‘सरकारला लॉकडाऊन करताना आनंद होत असेल का?’ नाना पाटेकरांचा आर्त सवाल

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?

मुंबईत लॉकडाऊन झाला तर काय होणार?; तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे का?

(Shopkeeper and traders association stand on Lockdown in Maharashtra)

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.