AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या सरकारचा शपथविधी कधी?; राहुल नार्वेकरांनी तारीख सांगितली

Rahul Narvekar on Maharashtra Government Formation : महाराष्ट्रात नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार? असे प्रश्न सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. अशातच राहुल नार्वेकर यांनी सत्तास्थापनेची तारीख सांगितली आहे. वाचा सविस्तर बातमी...

नव्या सरकारचा शपथविधी कधी?; राहुल नार्वेकरांनी तारीख सांगितली
राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: ANI
| Updated on: Nov 30, 2024 | 2:03 PM
Share

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या. त्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र अद्यापपर्यंत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मात्र भाजपच्या 132 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवल्याची माहिती आहे. तर आता गृहमंत्रिपद मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे. मात्र भाजप गृहमंत्रिपद द्यायला तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी रखडला आहे. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी महायुती सरकारच्या शपथविधीची संभाव्य तारीख सांगितली आहे.

नव्या सरकारचा शपथविधी कधी?

विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राहुल नार्वेकर साई दरबारी पोहचले. साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. राज्याला सक्षम सरकार मिळालं आहे. राज्याचे कल्याण होवो, अशी प्रार्थना राहुल नार्वेकरांनी साईं चरणी केली. यावेळी 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार आहे, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.

महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हाजनतेने मोठ्या विश्वासाने हे सरकार निवडून दिलं आहे. जनतेने भाजपला आणि महायुतीला अभूतपूर्व संख्याबळ दिलं आहे. हे सरकार येणाऱ्या पाच वर्षात राज्याला समृध्दी आणि भरभराटी मिळवून देणार आहे. माझ्या पक्षाने मला न मागता खूप काही दिलेलं आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेल, असं नार्वेकर म्हणाले.

ईव्हीएमवरून विरोधकांना टोला

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय घेण्यात आला. त्यावरून नार्वेकरांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधकांकडून सातत्याने रडीचा खेळ आहे. लोकसभा EVM वरच झाल्या आहेत. त्यावेळी विरोधकांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केलं. जेव्हा इच्छे विरुद्ध काही होतं तेव्हा विरोधक संबंधित संस्थेला दोषी ठरवतात. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग सर्वांवर टीका करतात. संविधानिक संस्थांवर यांचा विश्वास नाही. संविधानाबद्दल यांच्या मनात किती आदर आहे हे यातून दिसून येत आहे, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.

Follow Us
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे......
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात.
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान.
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच.
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.