AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायगडाला जाग आली तर… महायुतीवर संकटाचे ढग गडद, कोणी आणि का दिला इशारा?

Raigad Guardian Minister : आम्ही तिघे रायगडचे पालकमंत्री असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. ते तीन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पण त्यांनी पाठ फिरवताच पालकमंत्री पदाचा वाद उफाळला आहे. काय सुरू आहे रायगडमध्ये?

रायगडाला जाग आली तर... महायुतीवर संकटाचे ढग गडद, कोणी आणि का दिला इशारा?
रायगड पालकमंत्री पदाचा वाद पेटलाImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 06, 2025 | 10:41 AM
Share

रायगड, नाशिक, वाशिमच्या पालकमंत्री पदाच्या वादाने महायुतीने स्वत: जवळ निखारे तर ठेवले नाही ना? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीत लाथाळ्या दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायकड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये दिलजमाईचा प्रयत्न केला. आम्ही तिघे रायगडचे पालकमंत्री असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण त्यांनी पाठ फिरवताच पालकमंत्री पदाचा वाद उफाळला आहे.

रायगडच्या वादात औरंगजेबाची एंट्री

रायगडमध्ये शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले हे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. पालकमंत्री पदावरून रायगडमध्येच नाही तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. नाशिकमध्ये पण अशीच स्थिती आहे. दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमला रामराम ठोकला आहे. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून हट्ट आणि रूसवे, फुगवे सुरू असल्याचे दिसून येते.

इतकेच नाही तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेल्याचे दिसून आले. सुनील तटकरे यांचे नाव न घेता, आजचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसल्याचा घणाघात शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीवर नव्याने संकट आले आहे.

शिवसेनेचे तिन्ही आमदार आक्रमक

रायगड पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार आक्रमक झाले आहेत. पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील तटकरे यांनी बालहट्ट सोडावा अन्यथा रायगडास जाग आली तर तर रायगड पॅटर्न राबवण्याचा ही सूचक इशारा या तिन्ही आमदारांनी दिल्याचे समोर येत आहे.

निश्चिंत राहण्याचे संकेत

रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढल्याने त्यावर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे. आदिती तटकरे यांच्याऐवजी भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री करण्याची आग्रही भूमिका शिंदे सेनेने सातत्याने घेतली आहे. दरम्यान काल झालेल्या भेटीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड पालकमंत्री पदाबाबत निश्चिंत राहा असं तिन्ही आमदारांना आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे कळते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.