AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेसाठी मविआचं जागावाटप ठरलं; संजय राऊतांनी सविस्तर सांगितलं

Sanjay Raut on Mahavikas Aghadi Space Allocating : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठका सुरु आहेत, यात जागावाटपावर चर्चा केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या जागावाटपावर भाष्य केलंय. संजय राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

विधानसभेसाठी मविआचं जागावाटप ठरलं; संजय राऊतांनी सविस्तर सांगितलं
संजय राऊत
| Updated on: Aug 25, 2024 | 10:43 AM
Share

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात आघाडी आणि युतीच्या जागावाटपाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. अशातच महाविकास आघाडीचं जागावाटप व्यवस्थित सुरु आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. मुंबईबाबत काल चर्चा झाली. तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली. मुंबईचं जागावाटप जवळपास झालं आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे. त्यामुळे मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे. त्याचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे. तशी चर्चा या बैठकीत झाली. मुंबईतील 99 टक्के जागांवर आमचं एकमत आहे. आता उर्वरित महाराष्ट्रासाठी चर्चा सुरु होईल, असं संजय राऊत म्हणाले.

जागावाटपावर काय म्हणाले?

काल महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्षाचे बैठक पार पडली जागा वाटपा संदर्भात 99 टक्के जागांवर आमची सहमती झाली आहे. मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे काय मराठी माणसाच्या वर्चस्व राहिलं आहे. हे मुंबई तोडण्याची लचके तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. त्याला शह देण्यासाठी मुंबई एकदा पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे. त्यात संदर्भात जागा वाटप आम्ही करत आहोत. बंद दाराआड त्या संदर्भात कोणी बाहेरून काही सांगणार नाही. मीही सांगणार नाही. काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे. आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा होईल, असं राऊतांनी म्हटलं.

मोदींच्या दौऱ्यावर टीका

लखपती दिदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. युक्रेन पोलांड रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत .. लखपती दिदी कार्यक्रमाचं निमित्त आहे. ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत. त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना हे काय पद्धत झाली का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

प्रधानमंत्री महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे. महिलांच्या सुरक्षेला घेऊन या आमच्या बहिणी आहेत. त्यांच्या सुरक्षेला घेऊन याबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढला नाही. ज्या जळगावत प्रधानमंत्री आहेत त्यात जळगावत पंधरा दिवसात चार जणांवर अत्याचार झाला कोणीतरी जाऊन प्रधानमंत्र्यांना सांगा. पहिलं तुम्ही आमच्या दीदींना सुरक्षा द्या…प्रधानमंत्री फिरत राहतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी इकडून तिकडे फिरत राहतील. आधी त्यांनी महिलांच्या सुरक्षेवर बोलाव, असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.