AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शंभूराज देसाईंचा चंबू झालाय”; ठाकरे गटाने सीमावादावरून शंभूराज देसाईंना डिवचले….

सीमावादावरून भास्करराव जाधव यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी कर्नाटकात जाऊन त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दम द्या असं जाहीर आव्हान दिले आहे.

शंभूराज देसाईंचा चंबू झालाय; ठाकरे गटाने सीमावादावरून शंभूराज देसाईंना डिवचले....
| Updated on: Jan 04, 2023 | 10:53 PM
Share

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटल्यानंतर आपल्या राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इकडे यायचे नाही असा दम भरला. तेव्हापासून मंत्री शंभूराज देसाई यांचा चंबू झाला असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी केली. महाराष्ट्र-कर्नाटक वाद उफाळून आल्यानंतर स्थापन केलेल्या समिती आणि समन्वय मंत्री म्हणून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. ज्या वेळी सीमावाद जोरदारपणे उफाळून आला त्यावेळी चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांनी बेळगावमध्ये जाऊन मराठी भाषिकांची भेट घेणार असल्याचे ठरवले होते.

मात्र त्याच वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असा आदेश काढल्यानंतर शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही मंत्री सीमाभागात गेले नाहीत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सीमावादावरून भास्करराव जाधव यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी कर्नाटकात जाऊन त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दम द्या असं जाहीर आव्हान दिले आहे.

त्यामुळे सीमावादावरून राज्यातील नेत्यांचा वाद उफाळून येणार का असा सवाल आता करण्यात येत आहे. भास्करराव जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप बांडगूळ आहे ते कुणालाही मोठं होऊ देत नाही. भाजपसोबत ज्या पक्षांनी मैत्री केली ते पक्ष संपले असल्याची टीका त्यांनी केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हापासून महाराष्ट्रातील नेत्यांना दम दिला आहे तेव्हापासून शंभूराज देसाई यांचा चंभू झाल्याची सडकून टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.