AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आरोपीचा एन्काऊंटर करा, त्याला फाशी द्या’; कल्याणमध्ये महिला संतापल्या

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अपहरण, अत्याचार आणि हत्येने स्थानिक महिलांमध्ये तीव्र संताप आहे. या घटनेवर स्थानिक महिलांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.

'आरोपीचा एन्काऊंटर करा, त्याला फाशी द्या'; कल्याणमध्ये महिला संतापल्या
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 25, 2024 | 8:45 PM
Share

कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे स्थानिक महिला या अतिशय आक्रमक झाल्या आहेत. या घटनेनंतर स्थानिक महिला संतप्त झाल्या असून, महिला आणि लहान मुलींच्या मनात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक महिलांनी आरोपीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “जर सहा महिन्यांनी आरोपी सुटून येतो आणि अशा प्रकारचं कृत्य करतो, आम्ही आमच्या मुलींना बाहेर सोडायचं की नाही? अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्याचबरोबर आम्ही इकडे राहायचं की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. घरातून बाहेर मुलांना पाठवायला भीती वाटत आहे”, असं स्थानिक महिला म्हणाल्या आहेत.

“तो दर तीन ते चार महिन्यानंतर सुटून येतो. त्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे पाहिलं पाहिजे. आम्हालाच कळत नाही तो कसा सुटून येतो? आरोपीचा एन्काऊंटर करा किंवा त्याला फाशी द्या, हीच आमची मागणी आहे. आरोपीची दहशत सगळीकडे आहे. आता पण भीती वाटते, त्याचे मित्र येऊन आम्हाला मारतील का? अशी भीती आमच्या मनात आहे. पोलीस त्याला पैसे घेऊन सोडतात. त्याला पोलिसांच्या ताब्यात नाही, सर्वसाधारण लोकांच्या हातात द्या. आम्हाला काय करायचे ते करू”, अशा शब्दांत महिलांनी संताप व्यक्त केला.

सुलभा गायकवाड यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट

दरम्यान, भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पीडितेच्या कुटुंबियांना आम्ही भेटलो. तिची आई रडत आहे. त्यांच्या मोठा आक्रोश मनात आहे. घरात मुलीला आवाज देत आहे. तिचा आक्रोश बघवत नाही. तिचं एकच म्हणणं आहे की, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले आहे की, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल. राजकीय दबाव असल्याचं जे कोणी सांगतात त्याप्रमाणे चौकशी व्हावी. मात्र एका मुलीची हत्या झाली आहे. या वेळेला राजकारण करू नये”, अशी प्रतिक्रिया सुलभा गायकवाड यांनी दिली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.