AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची ठेवा… उद्धव ठाकरे खवळले; ‘त्या’ मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल

रोज पेपर बघतोय कधी नव्हे ते दिल्लीवाले इकडे येत आहेत. त्यांना परत पाठवायचं. आपल्याकडे घ्यायचं नाही. यापूर्वी आपल्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते. तेव्हा आपण मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून फिरत होतो. आता हेच लोक आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्या आमचं इंडिया आघाडीच सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं नक्की देऊ. आम्ही मोदीजी यांना गुजरातला पाठवल्या शिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची ठेवा... उद्धव ठाकरे खवळले; 'त्या' मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 20, 2024 | 9:01 PM
Share

सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळेच ते काहीही आरोप करत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी कधीच बोललो नव्हतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या दाव्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा. ती कुठली तरी खोली नव्हती. ती बाळासाहेबांची खोली होती. त्याच खोलीबाहेर तुम्हाला अमित शाहने उभं केलं होतं, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज अँटॉप हिल येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात थेट लढत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हा हल्लाबोल केला.

आदित्यला मुख्यमंत्री करतो

मी मुलाखत दिली होती. त्यात बाळासाहेबांच्या खोलीत बसून बोलणं झालं होतं असं म्हटलं होतं. मी देवदेवतांची शपथ घेऊन बोललो. यांनी 2014 ला आणि 2019 आपला विश्वास घात केला. आदित्य ठाकरेंना मी तयार करतो. त्यानंतर आपण त्याला मुख्यमंत्री करू असं मला फडणवीस म्हणाले होते. मी म्हटलं अहो असं करू नका. आधी त्याला आमदार करू. मी त्यांना म्हटलं अहो असं नको. त्यावर फडणवीस म्हणाले मी वरती जाणार आहे. म्हणजे केंद्रात जाणार आहे. त्यामुळे आदित्यला तयार करून मुख्यमंत्री करू, असं फडणवीस म्हटल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

ती बाळासाहेबांची खोली होती

उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले असल्याचं आज म्हणत आहेत. अहो देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. म्हणाले, कोणत्या तरी खोलीत घेऊन गेले. देवेंद्रजी ती कुठली तरी खोली नव्हती. ती बाळासाहेबांची खोली होती. ज्या खोलीबाहेर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना बाहेर थांबायला सांगितलं होतं, असा हल्लाबोल त्यांनी केला.

सरकार आल्यावर ईडी, सीबीआय आपलीच

आजची सभा प्रचारासाठी नाही, तर विजयासाठी आहे. लढत कुणामध्ये होणार हे सांगायचं तर ज्याने आपल्या आईवर वार केले त्याच्याशी आहे. जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, तो तुमचा काय होणार? त्याने आता काहीही देऊ द्या. श्रीखंड देईल, दूध देईल, त्याने काहीही देऊ द्या. आपलं सरकार आल्यावर ईडी, सीबीआय आपलंच आहे, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांना नाव न घेता दिला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.