AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शेतकऱ्यांच्या मुलांनी फक्त ही ट्रिक वापरली तर…’, नितीन गडकरी यांनी काय दिला असा सल्ला

काँग्रेसने निती बदलण्या ऐवजी जातीयवाद व सांप्रदायिकत्वाचे विष कालवले. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला की संविधान बदलणार आहे. पण संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणाची इच्छा असली तरी ते बदलता येणार नाही. आम्ही ते बदलू देणार नाही, असे गडकरी यांनी म्हटले.

'शेतकऱ्यांच्या मुलांनी फक्त ही ट्रिक वापरली तर...', नितीन गडकरी यांनी काय दिला असा सल्ला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
| Updated on: Nov 17, 2024 | 10:02 AM
Share

देशात पेट्रोलची कमतरता वाढणार आहे. परंतु पेट्रोलला पर्याय इथेनॉल ठरणार आहे. यामुळे आता इंडियन ऑइल कंपनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये इथेनॉलचे 400 पंप सुरू करणार आहे. तसेच आता पाच कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी जर इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या वापरल्या तर उसापासून बनणाऱ्या इथेनॉलचा वापर वाढणार आहे. तसेच सध्या मक्याला जो भाव मिळत आहे, त्याचेही कारण इथेनॉल आहे, असे केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे इथेनॉलच्या गाड्या वापल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील प्रचार सभेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांचे कल्याण कसे होईल? युवकांना रोजगार कसा मिळेल? स्मार्ट शहराबरोबर स्मार्ट व्हिलेज कशी तयार होतील? आपली शेती, उद्योगाची प्रगती कशी होईल? त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. त्यातील 60 वर्षे काँग्रेसला राज्य करण्याची संधी मिळाली. ग्रामपंचायत, नगरपालिका, विधानसभा जिल्हा परिषद, महापालिका सर्वच ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला, पण दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर यांची गरिबी दूर झाली नाही.

काँग्रेसमुळेच देशाचे नुकसान

मला पंडित नेहरू यांच्यावर टीका करायची नाही, पण काँग्रेसचे आर्थिक धोरण चुकीचे होते, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते म्हणाले, रशियाचे आर्थिक मॉडेल होते तेच काँग्रेसने स्वीकारले. त्याचा फटका देशाला बसला. चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते.

संविधान कोणीच बदलू शकत नाही…

काँग्रेसने निती बदलण्या ऐवजी जातीयवाद व सांप्रदायिकत्वाचे विष कालवले. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला की संविधान बदलणार आहे. पण संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणाची इच्छा असली तरी ते बदलता येणार नाही. आम्ही ते बदलू देणार नाही, असे गडकरी यांनी म्हटले.

मी पन्नास लाख कोटींची कामे केली. पण कोणी ठेकेदाराला माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही. आज परिस्थिती अशी आहे, काम झाले नाही तरी चालेल पण मला विचारल्या शिवाय करू नका, असे म्हटले जाते. आज आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी योग्य नीती आणि नेतृत्व असलेल्या पक्षाची गरज आहे. ही सर्व परिस्थिती बदलू शकते. हे बदलने आपल्या हातात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.