AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim Rain | वाशिम जिल्हात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू, सोनाळा धरण ओव्हर फ्लो, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा!

गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्प 100 टक्के भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथील अडाण नदीला मोठा पूर आलायं.

Washim Rain | वाशिम जिल्हात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू, सोनाळा धरण ओव्हर फ्लो, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 10:20 AM
Share

वाशिम : वाशिम (Washim) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. वाशिमच्या मानोरा, रिसोड, मालेगांवसह अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाले काठोकाठ भरून वाहत आहेत. मानोरा तालुक्यातील अरुणावती नदीला (River) ही मोठा पूर आलायं. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे (Heavy rain) वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला सोनाळा प्रकल्प देखील ओव्हर फ्लो झालायं.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच

गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्प 100 टक्के भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथील अडाण नदीला मोठा पूर आलायं. यामुळे नदी काठाच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

वाशिमच्या उकळी शिवारातील पैनगंगा नदीच्या पुरात एका महिलेचा मृतदेह सापडला

वाशिमच्या उकळी शिवारातील पैनगंगा नदीच्या पुरात एका महिलेचा मृतदेह वाहून आल्याची घटना 25 जुलैला सायंकाळी उघडकीस आली. सदर मृत महिलेचं वय अंदाजे 25 ते 30 वर्षे आहे. पोलिसांनी पैनगंगा नदीतून महिलेचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. सदर मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपास अनसिंग पोलीस करीत आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.