AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका क्षणात पक्ष फुटला… 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया समोर; या पक्षावर केला गंभीर आरोप

AAP MPs Resign : आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. 7 खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. यानंतर आता पक्षाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

एका क्षणात पक्ष फुटला... 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया समोर; या पक्षावर केला गंभीर आरोप
Kejriwal And ChaddaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 24, 2026 | 4:40 PM
Share

देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. 7 खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला असून पत्रकार परिषदेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. राघव चड्ढा यांनी आपल्या सोबत आणखी आठ जणांची नावे जाहीर केली, जे देखील भाजपमध्ये जाणार आहेत. यानंतर आता आम आदमी पार्टीने यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आपने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया

राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडून 7 राज्यसभा खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या घटनेला भाजपचे ऑपरेशन लोटस आणि अत्यंत घाणेरड्या राजकारणाचा खेळ असल्याचे म्हटले. संजय सिंह म्हणाले की,’आज भाजपने आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार फोडून घाणेरडे राजकारण केले आहे. पंजाबमधील लोक हे कधीही विसरणार नाहीत. पंजाबची जनता यांना कधीच माफ करणार नाही.

ज्या जनतेने मोठे केले त्यांनीच विश्वासघात केला

पुढे बोलताना संजय सिंह यांनी म्हटले की, राघव चड्डा यांना पक्षाने खासदार आणि आमदार बनवले आणि जनतेनेही त्यांना भरभरून पाठिंबा दिला. मात्र, ते आता भाजपसोबत गेले आहेत. संदीप पाठक यांचा उल्लेख सिंह म्हणाले की, पक्षाने त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि राज्यसभेत पाठवले. याशिवाय बलबीर सिंह, अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालीवाल आणि हरभजन सिंह यांची नावे घेत संजय सिंह यांनी म्हटले की, या सर्वांना जनतेने मोठे केले, पण आता त्यांनी त्याच जनतेचा विश्वासघात केला आहे.

राघव चड्डा काय म्हणाले?

भाजपसोबत जाण्याची घोषणा करताना राघव चड्डा यांनी म्हटले की, गेल्या एका वर्षांपासून मी पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर होतो. तुम्ही दूर का राहताय, असे मला विचारले जायचे. मी सर्वकाही सुरळीत होईल, यासाठी वाट पाहात होतो. परंतु आज मी तुम्हाला खरे कारण सांगतो. आम आदमी पार्टीच्या गुन्ह्यांमध्ये मला सामील व्हायचे नव्हते. आमच्याकडे फक्त दोन पर्याय होते. एक तर राजकारण सोडा किंवा आमच्या अनुभवाचा वापर करून काही सकारात्मक राजकारण करावे, हे दोन पर्याय होते. त्यामुळेच आम्ही आम आदमी पार्टीच्या राज्यसभेच्या दोन तृतीयांश खासदारांनी भाजपा पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेण्याचा घेतला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल