AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये

Dosa Death Case : मागच्या आठवड्यात डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस मुलींचा मृत्यू झाला. आई-वडिलांची प्रकृती गंभीर असून ते रुग्णालयात असल्याची बातमी आली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.

Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये
Parents
| Updated on: Apr 10, 2026 | 11:54 AM
Share

मागच्या आठवड्यात डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस मुलींचा मृत्यू झाला. आई-वडिलांची प्रकृती गंभीर असून ते रुग्णालयात असल्याची बातमी आली होती. गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा भागात ही घटना घडली होती. डेअरीवरुन खीरू आणलं. डोसा बनवताना ते खीरु वापरलं. या खीरुमुळे कुटुंबाची प्रकृती बिघडली असं संशय मुलीच्या आजोबांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी डेअरीवरुन ते खीरु तपासणीसाठी जप्त केलं होतं. आता या प्रकरणात चक्रावून सोडणारा खुलासा झाला आहे. सुरुवातीला या घटनेला फूड पॉयजनिंगशी जोडण्यात आलेलं. पण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने हा तर्क फेटाळून लावला आहे. विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याच तपासातून समोर आलय. त्यामुळे पोलीस आता आत्महत्या आणि हत्या या अँगलने तपास करत आहेत.

तपास यंत्रणांकडून मुलींचे आई-वडिल विमल प्रजापती आणि आई भावना प्रजापती यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात विषारी तत्व आढळून आलं. हे विषारी घटक सल्फास नावाच्या किटकनाशकात आढळतात. धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पोलिसांना विमलच्या घरात सल्फासच्या गोळ्या सापडल्या. त्यांची तपासणी सुरु आहे.

डोशामध्ये विष मिसळलेलं होतं की..

मुलींचा मृत्यू हा डोसा खाल्ल्यामुळे झालेला नाही हे यातून स्पष्ट झालय. विषारी पदार्थ याला जबाबदार आहे. 1 एप्रिलच्या रात्री विमल डेअरीमधून डोसा तयार करण्यासाठी खीरु घेऊन आला. त्यानंतर कुटुंबाने डोसे खाल्ले. डोशामध्ये विष मिसळलेलं होतं की, अन्य कुठल्या मार्गाने ते शरीरात पोहोचलं यावर आता तपास केंद्रीत झाला आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी पोलिसांच्या रडारवर

विषयाचं गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेने मेडिकल स्टोर आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु केलाय. भावना प्रजापती यांच्या वडिलांचं मेडिकल स्टोर आहे. त्यामुळे विषारी घटकाचा स्त्रोत तिथूनच आलेला असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. गुन्ह्याच्या मूळापर्यंत पोहोचण्यासाठी आसपास कॅमेऱ्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे.

आजी-आजोबांची कसून चौकशी

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार विमल प्रजापती बऱ्याच काळापासून बेरोजगार होता. मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचा त्याचा प्रयत्न होता. ऑस्ट्रेलियाला जायचही त्याचं प्लानिंग होतं. आर्थिक विवंचना आणि घरगुती तणाव या गोष्टी सुद्धा समोर आल्या आहेत. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तणाव वाढला. पोलिसांकडून आजी-आजोबांची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या मते या गुन्ह्यात आई-वडिल किंवा कुटुंबातील कुठला जवळचा व्यक्ती सहभागी असू शकतो. सध्या विमल आणि भावना आयसीयूमध्ये आहेत.

Follow Us
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.