AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अन् क्षणभर काळीज धडधडलं… अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पुन्हा काय घडलं? उड्डाण करावं लागलं रद्द

एअर इंडियाच्या या फ्लाइटने आज दुपारी 1:10 वाजता उड्डाण करायचे होते. पण सकाळपासूनच फ्लाइटला विलंब होत होता. आता नेमकं काय झालं जाणून घ्या..

मोठी बातमी! अन् क्षणभर काळीज धडधडलं... अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पुन्हा काय घडलं? उड्डाण करावं लागलं रद्द
Air India ExpressImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 17, 2025 | 1:47 PM
Share

अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण विमान अपघातानंतर खूप सावधगिरी बाळगली जात आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारी आणखी एअर इंडियाची फ्लाइट रद्द करण्यात आली आहे. या फ्लाइटमध्ये उड्डाणापूर्वी काही तांत्रिक बिघाड आढळले होते. मात्र, फ्लाइट रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान अपघातानंतर पहिल्यांदाच एअर इंडियाची फ्लाइट (AI-159) लंडनला जाणार होती. पण उड्डाणापूर्वी विमानाची तपासणी केली असता त्यात तांत्रिक बिघाड आढळला. त्यानंतर ही फ्लाइट उड्डाणासाठी रद्द करण्यात आली. ही फ्लाइट पुन्हा लंडनसाठी कधी रवाना होईल, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

वाचा: ‘ब्लॅक बॉक्स’मधून उलगडणार विमान पडण्यामागचे रहस्य, पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय असतं?

अपघातानंतर बदलला फ्लाइट क्रमांक

समोर आलेल्या माहितीनुसार, उड्डाणापूर्वीच विमानात बिघाड आढळल्याने फ्लाइट रद्द करण्यात आली. यामुळे तिथे उपस्थित अनेक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या फ्लाइटमध्ये बहुतांश प्रवासी राजकोट, आनंद, हलोल आणि खंभात येथील होते. फ्लाइट रद्द झाल्याबाबत प्रवाशांनी सांगितले की, एअर इंडियाच्या टीमने फ्लाइट रद्द झाल्याचे सांगितले. AI 171 क्रमांकाऐवजी आता विमानाला AI 159 हा क्रमांक देण्यात आला आहे.

सकाळपासूनच उड्डाणाला विलंब

एअर इंडियाच्या या फ्लाइटने आज दुपारी 1:10 वाजता उड्डाण करायचे होते. पण सकाळपासूनच फ्लाइटला विलंब होत होता. अखेरीस, तांत्रिक बिघाडामुळे ही फ्लाइट रद्द करण्यात आली. गेल्या आठवड्यात गुरुवारी अहमदाबादच्या मेघानीनगर येथे झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या फ्लाइट्समध्ये सातत्याने बिघाड होत आहेत. दुसरीकडे, अपघातानंतर अनेक विमानांमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बिघाड आल्याने तिला परत फिरावे लागले, तर अमेरिकेतून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटला कोलकातामध्ये सर्व प्रवाशांना उतरवावे लागले. याच दरम्यान, मस्कटमार्गे कोच्चीहून दिल्लीला जाणाऱ्या एका फ्लाइटची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली.

कोच्चीहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटचे नागपूरमध्ये लँडिंग

या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. माहिती मिळाल्यानंतर विमानाची आपत्कालीन लँडिंग करवण्यात आली आणि बीडीडीएस पथक आणि पोलिस आपापल्या पातळीवर तपास करत आहेत. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

नागपूरचे डीसीपी लोहित मतानी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर मस्कट-कोच्ची-दिल्ली मार्गे उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 2706 ची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करवण्यात आली. सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आहे, सध्या तपास सुरू आहे, आणि आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.