AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : काँग्रेस कार्यकारिणीची बैठक: सोनिया गांधी म्हणाल्या, ही वेळ पक्षाची ऋण फेडण्याची

राजकारण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अर्थव्यवस्था, संघटना, शेतकरी, कृषी, युवक आणि सशक्तीकरण या विषयांवर सहा गटांमध्ये चर्चा केली जाईल, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की, पक्षाने नेहमीच आपल्या सर्वांचे भले केले आहे. आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे.

Congress : काँग्रेस कार्यकारिणीची बैठक: सोनिया गांधी म्हणाल्या, ही वेळ पक्षाची ऋण फेडण्याची
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीImage Credit source: tv9
| Updated on: May 09, 2022 | 8:16 PM
Share

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यातील निवडणूकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. त्यानंतर या पाच राज्यात काँग्रेसने वरिष्ठ पातळीवर मोठे बदल केले. तसेच निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Election Strategist Prashant Kishor) यांच्याशी ही बोलणी करत पक्षात प्रवेशासाठी प्रयत्न केले गेले. मात्र ऐनवेळी माशी शिंकली आणि प्रशांत किशोर यांनी लांबूनच हात जोडले. त्यामुळे पक्षाला चार्ज करण्याची धुरा स्वत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) घेतली. त्यामुळे वाईट अवस्थेतून जात असलेला काँग्रेस पक्ष आता सक्रिय अवस्थेत आला आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक सुरू आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Former Congress President Rahul Gandhi), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.

तसेच सीडब्ल्यूसीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, आमचे सुमारे ४०० सहकारी उदयपूरमध्ये आयोजित चिंतन शिबीरात सहभागी होतील. त्यांच्यापैकी बहुतेकांनी पक्षाच्या संघटनेत किंवा केंद्रातील सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. काँग्रेस पक्षाचे ऋण आपण सर्वांनी फेडण्याची हीच वेळ असल्याचे त्या म्हणाले. तसेच अशा परिस्थितीत त्यांना कोणताही स्वार्थ न ठेवता आणि शिस्तीने काम करावे लागते. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी कोणतीही जादूची कांडी नाही. एकत्र काम करावे लागेल असेही त्या म्हणाल्या.

सीडब्ल्यूसीच्या बैठकीत त्या म्हणाल्या की, उदयपूरमध्ये 13 ते 15 मे रोजी होणारा ‘नवसंकल्प चिंतन शिविर’ हा निव्वळ कार्यक्रम नसावा. त्यातून पक्षाच्या पुनर्रचनेचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. या शिबिरात सुमारे 400 लोक सहभागी होत असून यातील बहुतांश जण संघटनेत कोणत्या ना कोणत्या पदावर किंवा सरकारमध्ये पदे भूषविली आहेत. राजकारण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अर्थव्यवस्था, संघटना, शेतकरी, कृषी, युवक आणि सशक्तीकरण या विषयांवर सहा गटांमध्ये चर्चा केली जाईल, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की, पक्षाने नेहमीच आपल्या सर्वांचे भले केले आहे. आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे.

तत्पूर्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, अजय माकन आणि अशोक गेहलोत यांनी बुधवारी चिंतन शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सूचनांचा विचार केल्यानंतर काही दिवसांनी, काँग्रेसने पुढील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘प्रिव्हिलेज्ड वर्किंग ग्रुप- 2024’ ची स्थापन केली जाईल, अशी घोषणा देखील यावेळी करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसने पक्षात प्रवेश करण्याची आणि पक्षाची निवडणूक रणनीती तयार करण्याची ऑफर नाकारली. 2023 मधील इतर राज्यांच्या निवडणुका आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकांबरोबरच या वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.