AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात आरक्षण अजून किती दिवस आरक्षण? काँग्रेस कधी संपवणार Reservation? राहुल गांधी यांचे अमेरिकेत मोठे विधान

Rahul Gandhi on Reservation : राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना भारतीय आरक्षण पद्धतीविषयी प्रश्न विचारले. त्यांना समान नागरी संहितेविषयी पण सवाल विचारण्यात आला. काय म्हणाले राहुल गांधी?

देशात आरक्षण अजून किती दिवस आरक्षण? काँग्रेस कधी संपवणार Reservation? राहुल गांधी यांचे अमेरिकेत मोठे विधान
राहुल गांधी यांचे आरक्षणाबाबत मोठे संकेत
| Updated on: Sep 10, 2024 | 9:14 AM
Share

देशातील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी देशातील आरक्षण संपविण्याविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या दौऱ्यात जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना भारतीय आरक्षण पद्धतीविषयी प्रश्न विचारले. समान नागरी संहितेविषयी पण सवाल केला. या प्रश्नावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काय म्हणाले राहुल गांधी?

आरक्षणाबाबत मोठी भूमिका

देशात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित जाती, आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी संघर्ष करत आहेत. आंदोलने सुरु आहेत. त्याच दरम्यान सामाजिक व्यवस्थेऐवजी आर्थिक गोळाबेरजेवर आरक्षणाची टूम निघाली आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न केला. त्यावेळी आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केले. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्या योग्य वेळ नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

आदिवासी, शोषीत आणि ओबीसीचा वाटा किती?

“तुम्ही आर्थिक आकड्यांवर नजर टाकली तर 100 रुपयांपैकी देशातील आदिवासींना 10 पैसे मिळतात. दलितांना 5 रुपये तर ओबीसींना पण इतकीच रक्कम वाट्याला येते. त्यांचा देशातील वाटा कमी आहे. भारतातील प्रत्येक क्षेत्रातील उद्योजकांची यादी काढा. मला त्यात अग्रभागी दलित, आदिवासींचे नाव दाखवा. मला वाटते देशातील 200 जणांमध्ये एखादा ओबीसी असेल आणि ते देशात 50 टक्के आहेत. पण आम्ही आजारपणावर इलाज करत नाही. आरक्षण एकमात्र साधन नाही. इतर पण साधन आहेत.” असे ते म्हणाले.

समान नागरी संहितेविषयी राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा जेव्हा भाजपचा याविषयीचा प्रस्ताव समोर येईल, त्याचवेळी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य असेल, असे ते म्हणाले. याविषयीवर इंडिया आघाडीत मतभेद होते. पण आता अनेक मुद्यांवर सहमती झाल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षणावर RSS चा ताबा

आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत की, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने देशातील संविधानीक संस्थांवर कब्जा केला आहे. त्यातच त्यांनी शिक्षण प्रणालीवर ताबा मिळवला आहे. मीडिया आणि इतर तपास यंत्रणांवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे मी घटनेचा, संविधानाचा उल्लेख केला. त्यावर जोर दिला. ज्यावेळी पीडित, शोषीत आणि बुद्धीजीवी वर्गाला हा धोका लक्षात आला, असे राहुल गांधी म्हणाले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.