AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence Day: 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर फडकतो तिरंगा, पाकिस्तानचा ध्वज कुठे फडकवतात?

Independence Day: भारताच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान त्याचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवतात. पाकिस्तानमध्ये त्यांचा ध्वज कोणत्या मुख्य वास्तूमधून फडकवल्या जातो, माहिती आहे का?

Independence Day: 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर फडकतो तिरंगा, पाकिस्तानचा ध्वज कुठे फडकवतात?
स्वातंत्र्य दिन
| Updated on: Aug 15, 2025 | 3:11 PM
Share

स्वातंत्र्यापूर्वी अखंड भारत फार मोठा होता. स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र देश झाले. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तर पाकिस्तान एक दिवस अगोदर 14 ऑगस्ट रोजी स्वतंत्रता दिवस साजरा करतो. 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावरून तिंरगा फडकवतात. दिल्ली येथे ऐतिहासिक लाल किल्ला आहे. पण पाकिस्तानमध्ये लाल किल्ला आहे का? यावेळी तिथे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ध्वज फडकवला. पण जिथे हा कार्यक्रम झाला ती जागा माहिती आहे का? स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचे पंतप्रधान कुठे त्यांचा राष्ट्रध्वज फडकवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

पाकिस्तानमध्ये कुठे फडकवतात राष्ट्रध्वज?

भारतात लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवतात. पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी एक खास जागा आहे. त्याला राष्ट्रीय स्मारक असे म्हणतात. पाकिस्तानच्या राष्ट्रीय स्मारकावर पंतप्रधान ध्वज फडकवतात. इस्लामाबाद या राष्ट्रीय राजधानी जवळ शकरपारिया नावाचा टेकड्या आहेत. तिथे हे स्मारक उभारण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर स्मारकाची निर्मिती

इस्लामाबादमध्ये पाकिस्तान राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती 2006 मध्ये करण्यात आली. इंजिनिअर सैय्यद महमूद खालीद यांनी हे स्मारक तयार केले. 23 मार्च 2007 रोजी या इमारतीचे उद्धघाटन करण्यात आले आहे. येथे एक संग्रहालय पण तयार करण्यात आले आहे. तिथे पाकिस्तानचा इतिहास आणि संस्कृतीचे (मुळात भारतीय संस्कृतीचे) दर्शन होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला तिरंगा

दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकवतात. लाल किल्ला ही काही मोठी इमारत नाही. तर भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. लाल किल्ला 1638 ते 1648 या दरम्यान मुघल बादशाह शाहजहा याने तयार केला होता. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता. तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. त्यांनी पाकिस्तानला पुन्हा आकळीक न करण्याचे बजावले. नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.