AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये भूकंप? चिदंबरम पण थरूर यांच्या वाटेवर… INDIA आघाडीवरील त्या वक्तव्याने आग, दक्षिणेतील राजकारणात काही मोठे घडणार?

P Chidambaram on India Alliance : मोदी सरकारच्या पाकिस्तानविरोधातील खमकी कारवाईचे सर्वांनीच कौतुक केले. तर युद्ध विरामावर काही पक्ष नाराज झाले. त्यातच काँग्रेसच्या पक्षीय भूमिकेविरोधात बडे नेते विधान करत असल्याने राजकीय पडद्याआड काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

काँग्रेसमध्ये भूकंप? चिदंबरम पण थरूर यांच्या वाटेवर... INDIA आघाडीवरील त्या वक्तव्याने आग, दक्षिणेतील राजकारणात काही मोठे घडणार?
शशी थरूर, पी. चिंदबरम, इंडिया आघाडीImage Credit source: गुगल
| Updated on: May 16, 2025 | 10:48 AM
Share

पाकिस्तानविरोधात लष्काराच्या ऑपरेशन सिंदूरने भारतीयांची मने जिंकली. त्यात मोदी सरकारची कुटनीती, धोरणाचे कौतुक झाले. तर युद्ध विरामावर पण काहींनी तोंडसुख घेतले. एकूणच या सर्व घडामोडींवर सध्या काँग्रेसमध्ये सुद्धा मतमतांतरे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कौतुक केले आहे. अनेक मंचावर त्यांचे हे प्रेम उफाळून आलेले दिसले. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सुद्धा हीच भूमिका घेतली. त्यांच्या एका वक्तव्याने काँग्रेसमध्ये भूकंपाची स्थिती आली आहे.

चिंदबरम यांनी नुकताच एका इंग्रजी दैनिकात लेख लिहिला. त्यात ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानमधील युद्ध विरामावर थेट भाष्य केले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या फैसल्यांचे कौतुक केले आहे. त्यातच त्यांच्या एका विधानाने मोठी आग लागली आहे. त्यांनी INDIA आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा केला. त्यामुळे येत्या काळात दक्षिण राज्यातील राजकारणाने मोठी कूस बदलली तर नवल वाटायला नको.

INDIA आघाडीवर मोठे प्रश्नचिन्ह

चिदंबरम यांनी गुरूवारी इंडिया आघाडीच्या अस्तित्वावर सवाल उठवला. ही आघाडी सध्या अस्तित्वात आहे का, असा घणाघात त्यांनी केला. त्यांनी ही टिप्पणी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमधील एका कार्यक्रमात केला. Contesting Democratic Deficit या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी त्यांनी आघाडीवर सडेतोड मत मांडले. या पुस्तकाच्या अनुषंगाने, इंडिया आघाडी अस्तित्वात आहे, या मताशी आपण सहमत नसल्याचे ते म्हणाले. खरं तर सलमान खुर्शीद त्याचे उत्तर देऊ शकतील, ते या आघाडीशी चर्चा करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत, असे चिदंबरम म्हणाले. जर इंडिया आघाडी कायम आहे, तर मला आनंद आहे. पण ही आघाडी मजबूत आहे, असे मला वाटत नाही. अर्थात ही आघाडी अजून जोडल्या जाऊ शकते, अजून वेळ आहे. अजून बऱ्याच घटना घडतील, असे चिदंबरम म्हणाले.

भाजपा सारखा राजकीय पक्ष इतिहासात नाही

कोणतीही आघाडी ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत नाही, असे ते म्हणाले. तर त्याचवेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी सारखा संघटित राजकीय पक्ष देशाच्या इतिहासात नसल्याची पुस्ती जोडली. हा केवळ एक पक्ष नाही तर एक मशीन आहे. या मशीन मागे सुद्धा एक मशीन असल्याचे ते म्हणाले. या दोन्ही संस्था देशातील अनेक संस्थावर नियंत्र ठेवतात. निवडणूक आयोगापासून ते पोलीस ठाण्यापर्यंत त्यांचे नियंत्रण आहे, अशी टीका सुद्धा त्यांनी भाजपावर केली. हा एकपक्षीय शासन व्यवस्थेसारखा काम करत असल्याचा धोका सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...