AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भय बिनु होइ न प्रीति…’; भारतीय सेनेचा पाकिस्तानला थेट इशारा

भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, त्यानंतर आज दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे, त्यापूर्वी भारताच्या तीन्ही सैन्य दलाकडून महत्त्वाची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.

'भय बिनु होइ न प्रीति…'; भारतीय सेनेचा पाकिस्तानला थेट इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2025 | 3:45 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, पाकिस्तानकडून देखील हल्ल्याचा प्रयत्न झाला, प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसानं झालं आहे. अखेर दोन्ही देशांकडून आता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, मात्र युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर देखील पाकिस्तानने युद्धविराम तोडल्याचं पाहायला मिळालं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या डिजोएमओमध्ये चर्चा होणार आहे, त्यापूर्वी भारतीय लष्कराच्या तीन्ही दलाची एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद झाली, यावेळी बोलताना पुन्हा एकदा भारतीय सेनेकडून पाकिस्तानला थेट इशारा देण्यात आला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एअर मार्शल एके भारतीय यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे, आता विनंती नाही तर युद्ध होईल असं त्यांनी म्हटलं आहे.  यावेळी बोलताना त्यांनी रामचरित मानसची एक चौपाई देखील म्हटली. ‘विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति।।’ अशा शब्दात भारतीय यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.  ‘समजदार के लिए इशारा काफी है,’  कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी आली तरी तिचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत. मला बोलायची गरज नाही. तुम्ही स्वत: पाहिलं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी देखील यावेळी पाकिस्तानला इशारा दिला आहे,  पुढची लढाई झाली तर ती वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत, असं राजीव घई यांनी यावेळी म्हटलं आहे.

भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.