जवळ ठेवा फक्त ही एक छोटीशी वस्तू , साप घरात कुठेही लपला असेल तर पळत बाहेर येईल, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही
भारतामध्ये जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते, हजारो जातीचे प्राणी, पक्षी भारतामध्ये आहेत, साप हा देखील या जैवविविधतेमधील महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आढळून येतात, त्यामध्ये काही साप हे विषारी असतात तर काही बिनविषारी

भारतामध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते, विविध प्रकारच्या परिसंस्था देखील आहेत. देशात हजारो जातीचे प्राणी, पक्षी आढळून येतात. प्राणी, पक्ष्यांसोबतच विविध जातीचे किटक, जलचल आणि सरपटनारे प्राणी देखील आढळतात, प्रत्येकाचं वैशिष्ट वेगळं आहे. तसंच निसर्गासाठी त्याचं कार्य आणि महत्त्व देखील वेगळं आहे. यामधीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे साप आहे. सापांना शेतकऱ्यांचा मित्र असं देखील म्हटलं जातं. कारण सापाचं मुख्य खाद्य म्हणजे उंदिर असतं, उंदिर पिकांची मोठी नासाडी करतात, त्यामुळे साप या उंदरांना खात असल्यामुळे उंदरांची संख्या काहीही न करता नियंत्रित राहाते आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. मात्र साप म्हटलं की आपल्याला भीती वाटते, त्यामुळे आजही अनेक ठिकाणी सापांना मारलं जातं.
साप दिसला तर काय करावं?
जर समजा तुम्हाला कुठेही साप दिसला तर घाबरून जाऊ नका, एक लक्षात ठेवा की भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काही जातीच या विषारी आहेत. बाकीच्या सर्व प्रजाती या बिनविषारी आहेत. विषारी जातींमध्ये नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार या चार जातींचा समावेश होतो. दरम्यान नाग हा फडी काढत असल्यामुळे आपण त्याला सहज ओळखू शकतो, मात्र बाकीचे साप हे विषारी आहेत की ? बिन विषारी हे आपण सहज ओळखू शकत नाही, त्यामुळे तुमच्या घरात, किंवा परिसरात कुठेही साप निघाला तर त्याला पकडू नका, किंवा मारू नका तर त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्यावर तो कुठे जातो यावर लक्ष ठेवा, सर्पमित्र हे या सापाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडतील.
साप घरात येऊ नये यासाठी काय करावं?
दरम्यान साप घरात येऊ नये, यासाठी अनेक उपाय आपण करू शकतो, जसं की घरात स्वच्छता ठेवणं, घरात जर उंदरांमुळे छीद्र झाले असतील तर ते बुजवणं, परिसरात गवत वाढू न देणं हे झाले सर्वसामान्य उपाय, मात्र अशा देखील काही विशिष्ट वनस्पती असतात, ज्या वनस्पतींचा वास हा सापांना सहन होत नाही, या वनस्पती जर तुमच्या घरात असतील तर साप घरात येतच नाही, आणि जर चुकून एखादा आलाच असेल तर तो देखील दूर निघून जातो. अशीच एक वनस्पती आहे, ती म्हणजे सर्पगंधा तुम्ही ही नवस्पती तुमच्या घरात लावली किंवा ती वाळल्यानंतर तीची मुळ आणि काड्या जर घरात ठेवल्या तर साप पुन्हा तुमच्या घरात येणार नाही.
