AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकाने उघडी, दारांना कुलूप नाही, तरीही होत नाही चोरी… या अनोख्या गावाची संपूर्ण भारतात होतेय चर्चा

Honest Village of India: भारतात असे एक गाव आहे जे आपल्या इमानदारीसाठी ओळखले जाते. या गावात अनेक दुकाने आहेत, मात्र त्यात सामान देण्यासाठी तिथे दुकानदार नसतो, तसेच या गावातील दुकानांना कुलूपही नसते.

दुकाने उघडी, दारांना कुलूप नाही, तरीही होत नाही चोरी... या अनोख्या गावाची संपूर्ण भारतात होतेय चर्चा
Honest Village of India
| Updated on: Oct 23, 2025 | 6:25 PM
Share

बातम्यांमध्ये तुम्ही दररोज चोरी, फसवणूक, पैसे लुबाडण्याच्या घटना घडत असतात. मात्र भारतात असे एक गाव आहे जे आपल्या इमानदारीसाठी ओळखले जाते. नागालँडमधील खोनोमा हे गाव खूप खास आहे. या गावात अनेक दुकाने आहेत, मात्र त्यात सामान देण्यासाठी तिथे दुकानदार नसतो, तसेच या गावातील दुकानांना कुलूपही नसते. याचाच अर्थ ही दुकाने 24 तास उघडी असतात. इथे लोक सामान खरेदी करतात आणि पैसे ठेवून जातात. या गावात कधीही चोरी होत नाही. या गावाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुकानं असतात उघडी

नागालँडमधील खोनोमा गावातील दुकानांना कुलूप लावले जात नाही. इथे कधीही फसवणूक किंवा चोरी होत नाही, त्यामुळे हे गाव प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दुकानदार नसलेली दुकाने आहेत. ग्राहक स्वतःचे सामान घेतात आणि योग्य रक्कम तिथे सोडून निघून जातात. या ठिकाणी कधीही चोरीचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे या गावाचा उल्लेख प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून केला जाते.

भारतातील पहिले ग्रीन व्हिलेज

खोनोमा हे गाव प्रामाणिकपणा, सौंदर्य आणि स्वच्छ वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथील लोकांना कोणतीही भीती नसते. येथील दुकानांमध्ये वस्तू आणि इतर ग्राहकांना सोडलेले पैसे असतात. हे पैसे आणि सामान सुरक्षित असते. येथील गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, इतरांची फसवणूक करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे कोणीही चोरी करत नाही. त्यामुळे संपूर्ण देशात या गावाची चर्चा होत आहे. तसेच खोनोमा हे भारतातील पहिले हिरवे गाव म्हणूनही ओळखले जाते. या गावातील लोक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. या गावाला भेट देण्यासाठी भारतासह परदेशातूनही पर्यटक येत असतात.

या गावाला कसे पोहोचायचे?

खोनोमा गाव हे अनोखे गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिमापूरला पोहोचावे लागेल. यासाठी तुम्ही विमान किंवा रेल्वे प्रवास करू शकता. त्यानंतर दिमापूरवरून कोहिमाला टॅक्सी किंवा बसने 3 तासांच्या प्रवासानंतर पोहोचू शकता. त्यानंतर तुम्हाला टॅक्सी किंवा शेअर्ड जीपने खोनोमा गावात सहज जाता येईल. त्यानंतर या ठिकाणचे सौंदर्य आणि येथील दुकाने पाहू शकतो.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.