AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती असंवेदनशील : सर्वेक्षण

जवळपास अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती संवेदनशील नाहीत, अशी माहिती आयएएनएस सी वोटरने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती असंवेदनशील : सर्वेक्षण
| Updated on: Jan 21, 2021 | 9:18 PM
Share

नवी दिल्ली : जवळपास अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती संवेदनशील नाहीत, अशी माहिती आयएएनएस सी वोटरने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणात म्हटलं आहे की, चुकीच्या सूचना आणि माहितीच्या आभावामुळे तिबेटबाबत भारतात अशी स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वेक्षणात म्हटले आहे की, 50 टक्क्यांहून अधिक भारतीय तिबेटच्या स्थितीबाबत अनभिज्ञ आहेत. तर जवळजवळ एक चतुर्थांश लोकांना वाटतं की तिबेट हे चीनचे एक राज्य आहे. तर तीन चतुर्थांश भारतीयांना तिबेटमधील परिस्थितीविषयी काहीच माहिती नाही. (More than half of Indians are insensitive about Tibet : IANS Survey)

भारतीय लोक तिबेटबाबत आणि तिथल्या परिस्थितीबाबत असंवेदनशील आहेत. केवळ ईशान्य भारतातील लोक तिबेटविषयी संवेदनशील आहेत. उतर भारतातील लोकांना तिबेटविषयी तुटपुंजी माहिती आहे. तर दक्षिण भारताला लोकांना तिबेटविषयी काहीच माहिती नाही. या भागातील लोक तिबेटविषयी खूपच असेंवदनशील आहेत. एक तृतीयांश भारतीयांना तिबेटमधील परिस्थितीबाबत कोणतीही चिंता नाही. तर उर्वरित भारतीयांना तिथली काहीच माहित नाही. त्यामुळे त्यांच्या तिबेटविषयी काहीच भावना नाहीत. भारतीयांना तिबेट भारताचा भाग वाटत नाही.

53 टक्के भारतीयांच्या मते भारतीय माध्यमं तिबेटविषयी कमी बातम्या देतात

जवळजवळ अर्ध्याहून अधिक भारतीयांचं मत आहे की, भारतीय माध्यमं तिबेटविषयी खूपच कमी बातम्या प्रसिद्ध करतात. अधिकांश भारतीय म्हणतात की, भारतात तिबेटचा मुद्दा अंडर-रिपोर्टेड आहे. त्या तुलनेत ईशान्य भारतातील लोकांचं मत वेगळं आहे. ईशान्य भारतातील 71 टक्के लोक म्हणतात की, गेल्या सहा महिन्यांपासून तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांवर, ऑनलाईन पोर्टल्सवर त्यांनी तिबेटबाबतच्या बातम्या पाहिल्या आहेत.

शहरी भागात राहणाऱ्या 50 टक्के भारतीयांचं म्हणणं आहे की, त्यांनी वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाईन पोर्टल्सवर गेल्या सहा महिन्यांमध्ये कधीही तिबेटविषयी बातम्या वाचल्या/पाहिल्या नाहीत. तर ग्रामीण भागातील 54 टक्के भारतीयांनी हेच विचार मांडले आहेत.

दलाई लामा यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे

दोन तृतीयांश भारतीयांना वाटतं की बौद्ध धर्मगुरु दलाई लामा हे आधुनिक भारतातील एक प्रभावी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक व्यक्ती आहेत. तर काहींना असे वाटते की, चीनबाबत दलाई लामा यांनी आक्रमक व्हायला हवे. त्यांनी तसे न केल्याने त्यांचं जागतिक स्तरावील राजकीय वजन कमी झालं आहे. दोन तृतीयांश भारतीयांना असे वाटते की, दलाई लामा यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे.

हेही वाचा

तिबेटमध्ये चिनी सैनिकांकडून मिलिट्री लॉजिस्टिक हबची निर्मिती, सॅटेलाईट फोटोंतून उघड

भारतातील तिबेटियन नागरिकांच्या ‘या’ कृतीने चीनचा ब्‍लड प्रेशर वाढला, वाचा काय आहे प्रकरण?

(More than half of Indians are insensitive about Tibet : IANS Survey)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.