AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमाजी, तुम्हाला देश कधीही विसरणार नाही : नरेंद्र मोदी

भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपला आहे. एक अशा नेता ज्यांनी सेवा आणि गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारत दु:खी आहे.

सुषमाजी, तुम्हाला देश कधीही विसरणार नाही : नरेंद्र मोदी
| Updated on: Aug 07, 2019 | 1:19 AM
Share

नवी दिल्ली : भारताच्या धडाकेबाज माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी (Sushma Swaraj) वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली.

सुषमा स्वराज यांच्या निधनाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. “माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील गौरवशाली अध्याय समाप्त झाला आहे. सुषमा स्वराज यांनी देशासाठी केलेल्या कामांसाठी नेहमीच स्मरणात राहतील.”

भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपला आहे. एक अशा नेता ज्यांनी सेवा आणि गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारत दु:खी आहे. सुषमा स्वराज देशातील करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत होत्या.

सुषमा स्वराज या जबरदस्त वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्व पक्षीयांकडून मान सन्मान मिळाला. जेव्हा जेव्हा विचारसरणी आणि भाजपच्या हिताचा मुद्दा असेल, तिथे त्यांनी कधीच तडजोड केली नाही. विचारसरणी आणि पक्षाच्या विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं.

एक उत्तम प्रशासक म्हणून सुषमा स्वराज यांनी जी जी पदं भूषवली, तिथे तिथे सर्वोच्च योगदान दिलं. अनेक देशांशी भारताचे संबंध सुधारण्यात सुषमा स्वराज यांची महत्त्वाची भूमिका होती. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.

सुषमा स्वराज यांच्या निधनाने माझं वैयक्तिक नुकसान झालं आहे. भारतासाठी त्यांनी दिलेलं योगदान देश कधीही विसरु शकणार नाही. या दु:खद घटनेत कुटुंबीयांच्यासोबत आहोत. ओम शांती!

संबंधित बातम्या :

Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

57 मुस्लिम देशांसमोर सुषमा बरसल्या होत्या, भारत गांधींचा देश, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते!

Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!

विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.