AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#WhatlndiaThinksToday : दोन दिवसीय ‘थिंक फेस्ट’, 17 मे रोजी अमित शाह, डेव्हिड कॅमेरुन आणि हमीद करझाईंची प्रमुख उपस्थिती

येत्या 19 आणि 18 जूनला दिल्लीतील ताज पॅलेस येथे 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

#WhatlndiaThinksToday : दोन दिवसीय 'थिंक फेस्ट', 17 मे रोजी अमित शाह, डेव्हिड कॅमेरुन आणि हमीद करझाईंची प्रमुख उपस्थिती
दोन दिवसीय 'थिंक फेस्ट'Image Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 5:08 PM
Share

नवी दिल्ली : भारताचे नंबर वन न्यूज नेटवर्क tv9 येत्या 17 आणि 18 जूनला दिल्लीतील ताज पॅलेस येथे ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today) या जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या ग्लोबल समिटच्या व्यासपीठावर राजकारण  (Politics), शासन, अर्थशास्त्र, आरोग्य, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत आणि प्रभावशाली व्यक्ती सहभागी होणार आहे. अशा 75 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांचे आयोजन tv9 या समिटमध्ये करणार आहेत. या ग्लोबल थिंक फेस्टमध्ये जागतिक स्तरावर भारताचा वाढता दावा, जागतिक नेता बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल आणि जागितक दहशतवाद अशा महत्वाच्या आणि गंभीर विषयांवर विचारमंथन होणार आहे. आंतरराष्ट्रीय व्याख्यातांमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांचा समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय वक्त्यांमध्ये गृहमंत्री अमित शाह. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही या व्यासपीठावरुन बोलणार आहेत.

या अनोख्या आणि अशा मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातील नामवंत धोरणकर्त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा टीव्ही9च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 130 कोटी भारतीयांना सहभागी करून घेण्याच्या आकांक्षेनं, ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटचे उद्घाटन सत्र ‘विश्वगुरू कितने पास कितने दूर’ या थीमवर केंद्रीत असेल.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 17 जूनला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिखर परिषदेचे मुख्य भाषण करतील. तर 18 जूनला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दुसऱ्या दिवशी शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. 15 केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील भारत विश्वगुरू होण्याच्या किती जवळ आहे. यावर त्यांचा दृष्टीकोन सामायिक करतील

ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन हे ‘इंडिया इन द न्यू इंटरनॅशनल ऑर्डर’ या विषयावर या जागतिक मंचावरुन बोलतील तर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई हे ‘दहशतवाद: मानवतेचा शत्रू’ या विषयावर भाष्य करतील.

ग्लोबल समिटमधील त्यांच्या सहभागाबद्दल उत्साहित, डेव्हिड कॅमेरॉन म्हणाले,’टीव्ही9च्या ग्लोबल समिटशी जोडल्याबद्दल मला आनंद होत आहे. ज्यामध्ये भारतातील काही प्रतिभाशाली लोक आजच्या जगाची आव्हाने आणि शक्यतांवर चर्चा करण्यासाठी सैन्यात सामील होतील. आमच्या पंतप्रधानपदाच्या काळात आम्ही ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी काम केले याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. 2010मध्ये जगातील सर्वात जुनी लोकशाही आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही यांच्यातील पहिले व्यापार मिशन आम्ही परत आणले’

ते पुढे म्हणाले की, ‘सध्या जगापासून एका दशकाहून अधिक काळ दूर राहिल्यानंतर आम्ही या भागीदारीची चाचणी घेण्यासाठी परतत आहोत. हे अत्यंत आनंददायी आहे. आव्हाने वेगळी असली तरी दोन्ही देशांमधील भागीदारी अतूट आहे. या विषयावर बोलण्यासाठी बरेच विषय आहेत. म्हणूनच मी या महत्वाच्या परिषदेशी संलग्न होण्यास उत्सुक आहे.’

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई म्हणाले, ‘मी टीव्ही9च्या या जागतिक शिखर परिषदेत सहभागी होण्यास उत्सुक आहे. भारत आणि आफगाणिस्तान यांच्यातील परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर चर्चाकरण्यासही मी उत्सुक आहे.

भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सामूहिक वचनबद्धता आवश्यक – सीईओ

टीव्ही9 नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरुण दास म्हणाले की, ‘संवाद, चर्चा आणि विचारविमर्शाद्वारे जागितक क्षेत्रात भारताच्या नेतृत्वाचा रोडमॅप तयार करणे हा या शिखर परिषदेचा उद्देश आहे. कोणताही प्रवास आव्हानांशिवाय नसतो. हेतू जितका उदात्त तितका महत्वाकांशी हे ध्येय मजबूत नेतृत्व,सामूहिक इच्छाशक्ती आणि संपूर्ण राष्ट्राच्या वजनब्दतेने प्रेरित आहे. प्रवचनातून भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी नवीन आणि क्रांतिकारी विचार आणि कल्पना निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश आहे’

या चार महत्वाच्या विषयांवर शिखर परिषद

हा कार्यक्रम राजकारण आणि शासन, व्यवसाय आणि अर्थव्यवस्था, सामाजिक-सांस्कृती आणि आरोग्य आणि क्रीडा आणि मनोरंजन अशा चार महत्वाच्या विषयांवर केंद्रीत आहे. यामध्ये भारताने प्रतिकूल परिस्थितीत नव्या जागतिक व्यवस्थेचा यशस्वीपणे सामना कसा केला यावर चर्चा होणार आहे. तसेच सर्व ज्ञात-अज्ञात कारणे आणि आव्हाने ज्यांना आपण सामोरे जातो त्याबद्दल अर्थपूर्ण चर्चा होईल. जागतिक सर्व राष्ट्रांमध्ये योग्य आणि सन्माननीय स्थान मिळवण्याची भारताची इच्छा आहे.

विविध मुद्द्यांवर या ग्लोबल समिटमध्ये सहभागी होणाऱ्या वक्त्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Follow Us
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.