BLOG: ‘नोटा’ला सर्वाधिक मतं पडल्यास निवडणूकच रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका

एखाद्या मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी सर्वाधिक मतदान 'नोटा'ला असेल तर ती निवडणूकच रद्द करा आणि तिथं पुन्हा निवडणूक घ्या, असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावे अशी विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय

BLOG: 'नोटा'ला सर्वाधिक मतं पडल्यास निवडणूकच रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
EVM Machine
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 5:43 PM

नोटा अर्थात ‘नन ऑफ द अबोव’. एखाद्या मतदाराला निवडणूक लढवत असलेला एकही उमेदवार प्रतिनिधीत्व करण्यासाठी पात्र नाही असं वाटत असेल, तर तो नोटाला मतदान करतो. एखाद्या मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी सर्वाधिक मतदान ‘नोटा’ला असेल तर ती निवडणूकच रद्द करा आणि तिथं पुन्हा निवडणूक घ्या, असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावे अशी विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय (TV9 Marathi Executive Editor Gajanan Kadam write on NOTA election and Supreme court).

निवडणूक रद्द झालेल्या मतदारसंघातल्या सर्व उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी अशीही याचिकेत मागणी आहे. सुप्रीम कोर्टानंही या याचिकेची दखल घेऊन केंद्र सरकारला तुमची भूमिका मांडा म्हणून नोटीस बजावलीय. राजकीय पक्ष खूपच लोकशाहीविरोधी पद्धतीनं उमेदवार निवडतात, मतदारांशी जराही सल्लामसलत होत नाही, त्यामुळंच मतदारसंघातले किती तरी लोकांचा उमेदवारांशी काही संबंधच येत नाही, असा दावा या याचिकेत आहे. लोकांना नकाराधिकाराचा वापर करायला मिळाला तर भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण, जातीयता, धर्मवाद, भाषेवरुन होणारा भेदभाव, प्रादेशिकवाद या लोकशाहीच्या सातही शत्रूंचा बंदोबस्त होईल, राजकीय पक्षही प्रामाणिक व देशप्रेमी उमेदवारांनाच उमेदवारी देतील असं याचिकेत म्हंटलंय.

‘घटनेतलं कलम 324 वापरुन निवडणूक आयोगानं निवडणूकच रद्द करावी’

वकील आणि भाजपचे नेते आश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केलीय. वरिष्ठ वकील मनेका गुरुस्वामी उपाध्याय यांच्यावतीनं युक्तिवाद करत आहेत. “आम्हाला नकाराचा अधिकार आहे, त्याला न्याय द्या” अशी विनंती या याचिकेत आहे. घटनेतलं कलम 324 वापरुन निवडणूक आयोगानं निवडणूकच रद्द करावी.

नोटीसा बजावण्यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला काही प्रश्नही विचारले. “लोकांवर प्रभाव असलेल्या एखाद्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार नाकारले गेले तर संसदेत सदस्यांच्या किती तरी जागा रिकाम्या राहतील”, असं निरीक्षण सरन्यायाधीश बोबडे यांनी नोंदवलं.

’99 टक्के लोकांनी नोटाला पसंती देऊनही उरलेले 1 टक्के मतदार निवडणुकीचा निकाल ठरवतात’

वकील गुरुस्वामी यांनी युक्तिवाद करताना “नोटाची 50 टक्के एवढी मर्यादा ठेवा. म्हणजे निम्म्या मतदारांनी नाकारले तर निवडणूक रद्द करा. सध्या असे काही नियम नसल्यानं 99 टक्के लोकांनी नोटाला पसंती देऊनही उरलेले 1 टक्के मतदार निवडणुकीचा निकाल ठरवतात”, अशी वस्तुस्थिती सांगितली.

या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी हतबलता व्यक्त करत म्हटलं, “ही घटनात्मक समस्या आहे. तुमचं म्हणणं मान्य केलं आणि सर्व जागांवर ‘नोटा’च सर्वाधिक झाल्या तर मतदारसंघाचे प्रतिनिधीच संसदेत नसतील आणि मग वैध संसद कशी स्थापन करायची?” असा सवाल केला.

‘उमेदवार नाकारले जाऊ लागले तर राजकीय पक्षही जागे होतील’

सरन्यायाधीशांच्या सवालाचा प्रतिवाद करताना वकील गुरुस्वामी यांनी, “आम्हालासुद्धा हेच म्हणायचं आहे. उमेदवार नाकारले जाऊ लागले तर राजकीय पक्षही जागे होतील आणि सर्वांना पसंत पडतील असेच उमेदवार पक्षांकडून दिले जातील” असं सांगितलं.

‘तुमची सूचना आणि सल्ला स्विकारण्यासाठी खूपच कठोर’

“तुमच्या म्हणण्याचं महत्व आम्ही समजतो, पण तुमची सूचना आणि सल्ला स्विकारण्यासाठी खूपच कठोर आहे” अशी टिप्पणी सरन्यायाधीश बोबडे यांनी यावेळी केली.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामासुब्रमण्यम या 3 न्यायमूर्तींच्या पीठापुढं याची सुनावणी सुरुय. केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालय आणि निवडणूक आयोगाला या खंडपीठानं नोटीस बजावून म्हणणं मांडायला सांगितलंय.

1999 पासून राइट टू रिजेक्ट अर्थात नकाराधिकाराचा मुद्दा गाजतोय

1999 लाही राइट टू रिजेक्ट अर्थात नकाराधिकाराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी कायदा आयोगानं आपल्या 170 व्या अहवालामध्ये वैध मताच्या 50 टक्के पेक्षा जास्त मिळालेल्या उमेदवारालाच विजयी घोषित करावं, अशी शिफारस केली होती. निवडणूक आयोगानंही 2001 ला लिंगडोह हे निवडणूक आयुक्त असताना नकाराधिकाराला निवडणूक आयोगानं योग्य ठरवलं होतं.

सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार?

2004 साली निवडणूक सुधारणांमध्ये तत्कालीन निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमूर्ती यांनीही समाविष्ट केलं होतं. पण पुढे निवडणूक आयोगानं नकाराधिकाराऐवजी नोटाचा पर्याय दिला. निवडणूक आयोग आणि कायदा आयोगानंही नकारात्मक वा तटस्थ असा पर्याय ईव्हीएमममध्ये द्यावा असं सुचवलं. तसंच काही निश्चित मतं नोटाला मिळाली तर निवडणूक रद्द करावी आणि नव्यानं निवडणूक घेता येऊ शकतं असं सुचवलं. पण नोटाचा पर्याय दिल्यानंतर या शिफारशी तिथंच राहिल्या. आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं ते पाहण्यासारखं असेल.

हेही वाचा :

केरळात सत्ताधारी माकपची उमेदवार यादी कशीय?

आसामची निवडणूक फिरतेय परफ्यूमवाल्याभोवती !

BLOG : एका चाणक्याचे भाकीत…

TV9 Marathi Executive Editor Gajanan Kadam write on NOTA election and Supreme court

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.