AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 Mumbai Attack: 10 दहशतवादी, ताबडतोब फायरिंग, 60 तासांची दहशत अन् 166 लोकांचा मृत्यू; त्या काळ्या दिवसाची कहाणी

दहशतवाद्यांमध्ये अजमल कसाबचाही समावेश होता. त्याला सुरक्षा दलांनी जिवंत पकडलं आणि त्याला फाशी देण्यात आली. एनएसजी कमांडोंना पाचारण करण्यात आलं होतं. त्यांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या शौर्यामुळे भारतावर आलेलं हे संकट टळलं.

| Updated on: Nov 26, 2024 | 12:08 PM
Share
एकीकडे 26 नोव्हेंबर हा 'संविधान दिवस' म्हणून ओळखला जातो, तर दुसरीकडे या तारखेशी निगडीत एक असा काळा दिवस आहे, जो क्वचितच कोणी विसरू शकेल. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेला 16 वर्षं उलटली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात घटनेच्या कटू आठवणी जिवंत आहेत.

एकीकडे 26 नोव्हेंबर हा 'संविधान दिवस' म्हणून ओळखला जातो, तर दुसरीकडे या तारखेशी निगडीत एक असा काळा दिवस आहे, जो क्वचितच कोणी विसरू शकेल. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेला 16 वर्षं उलटली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात घटनेच्या कटू आठवणी जिवंत आहेत.

1 / 7
या दहशतवादी हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांनी आपले प्राण गमावले होते. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. देशातील सर्वांत  सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं.

या दहशतवादी हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांनी आपले प्राण गमावले होते. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. देशातील सर्वांत सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं.

2 / 7
पाकिस्तानातील कराची इथून 10 दहशतवादी बोटीने मुंबईला रवाना झाले होते. समुद्रमार्गेच ते मुंबईत दाखल झाले होते. भारतीय नौदलाला चकवा देण्यासाठी त्यांनी वाटेत एका भारतीय बोटीचं अपहरण केलं होतं. त्या बोटीवरील सर्व लोकांना त्यांनी ठार केलं होतं.

पाकिस्तानातील कराची इथून 10 दहशतवादी बोटीने मुंबईला रवाना झाले होते. समुद्रमार्गेच ते मुंबईत दाखल झाले होते. भारतीय नौदलाला चकवा देण्यासाठी त्यांनी वाटेत एका भारतीय बोटीचं अपहरण केलं होतं. त्या बोटीवरील सर्व लोकांना त्यांनी ठार केलं होतं.

3 / 7
या बोटीचा वापर करून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मच्छी मार्केटमध्ये उतरले. त्यावेळी स्थानिक मच्छिमारांनाही त्यांच्यावर संशय आला होता. याबाबत पोलिसांना कळवलं असता त्यांनी सुरुवातीला त्याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं.

या बोटीचा वापर करून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मच्छी मार्केटमध्ये उतरले. त्यावेळी स्थानिक मच्छिमारांनाही त्यांच्यावर संशय आला होता. याबाबत पोलिसांना कळवलं असता त्यांनी सुरुवातीला त्याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं.

4 / 7
लष्कर-ए-तैयबाच्या सशस्त्र दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस हा हल्ला सुरू होता आणि त्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 च्या या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली होती.

लष्कर-ए-तैयबाच्या सशस्त्र दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस हा हल्ला सुरू होता आणि त्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 च्या या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली होती.

5 / 7
दहशतवाद्यांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरवर निशाणा साधला होता. 26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

दहशतवाद्यांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरवर निशाणा साधला होता. 26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

6 / 7
सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला होता. लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं होतं.

सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला होता. लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं होतं.

7 / 7
Follow Us
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना
तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा...
Harshwardhan Sapkal | तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा पवारांवर पुन्हा हल्लाबोल
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार...
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार... दिल्लीत खरंच काही तरी घडतंय?