AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानच्या वाळवंटात एकमेकांत जीव गुंतला, ऑस्ट्रेलियाची प्रेयसी तब्बल 50 वर्षानंतर येतेय भेटायला, वाचा अजरामर प्रेमाची कहाणी

राजस्थानमधील एक प्रियकर आपल्या प्रेयसीला तब्बल 50 वर्षानंतर भेटणार आहे. (rajasthan jaisalmer marina love story)

| Updated on: Apr 04, 2021 | 2:02 PM
Share
असं म्हणतात की प्रेमाला वयाची, देशाची अट नसते. प्रेम कधीही कोणासोबतही होऊ शकतं. याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे. राजस्थानमधील एक प्रियकर आपल्या प्रेयसीला तब्बल 50 वर्षानंतर भेटणार आहे. या प्रियकराचे वय 82 वर्षे आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रेमिका ही ऑस्ट्रेलिया देशातली असून तिचं नाव मरीना आहे.  राजस्थानमधील 82 वर्षीय प्रियकर सध्या सुरक्षा रक्षकाचं काम करतो. (Photos: IG- haumansofbombay)

असं म्हणतात की प्रेमाला वयाची, देशाची अट नसते. प्रेम कधीही कोणासोबतही होऊ शकतं. याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे. राजस्थानमधील एक प्रियकर आपल्या प्रेयसीला तब्बल 50 वर्षानंतर भेटणार आहे. या प्रियकराचे वय 82 वर्षे आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रेमिका ही ऑस्ट्रेलिया देशातली असून तिचं नाव मरीना आहे. राजस्थानमधील 82 वर्षीय प्रियकर सध्या सुरक्षा रक्षकाचं काम करतो. (Photos: IG- haumansofbombay)

1 / 5
याविषयीची सविस्तर माहिती ह्यूमन ऑफ बॉम्बे ऑफिशियल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेली आहे. या पेजवर दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षक आणि ऑस्ट्रेलीयाची मरीना यांची प्रेमकहानी राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील कुलधरा गावातील आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलियाची मरीना भारतातील राजस्थान फिरायला आली होती. राजस्थान फिरत असताना ही तरुण मुलगी जैसलमेरमधील या तरुणाच्या प्रेमात पडली होती. सत्तरच्या दशकात हा सुरक्षा रक्षक तडफदार आणि अगदीच तरुण दिसायचा.

याविषयीची सविस्तर माहिती ह्यूमन ऑफ बॉम्बे ऑफिशियल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेली आहे. या पेजवर दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षक आणि ऑस्ट्रेलीयाची मरीना यांची प्रेमकहानी राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील कुलधरा गावातील आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलियाची मरीना भारतातील राजस्थान फिरायला आली होती. राजस्थान फिरत असताना ही तरुण मुलगी जैसलमेरमधील या तरुणाच्या प्रेमात पडली होती. सत्तरच्या दशकात हा सुरक्षा रक्षक तडफदार आणि अगदीच तरुण दिसायचा.

2 / 5
या प्रेमकहानी विषयी 82 वर्षीय सुरक्षा रक्षकाने सविस्तर सागितले आहे. "जेव्हा मी मरीनाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी 30 वर्षांचा होतो. मरीना तेव्हा राजस्थानमध्ये वाळवंट पाहायला आली होती. पाच दिवसाच्या यात्रेवर ती आली होती. या यात्रेदरम्यान मी तिच्यासोबत होतो. त्यावेळी मी तिला उंटावर कसं बसायचं हे शिकवलं होतं. याच काळात आम्ही एकमेकांवर प्रेम करुन बसलो होतो," असं  या सुरक्षा रक्षकाने सांगितलं आहे.

या प्रेमकहानी विषयी 82 वर्षीय सुरक्षा रक्षकाने सविस्तर सागितले आहे. "जेव्हा मी मरीनाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी 30 वर्षांचा होतो. मरीना तेव्हा राजस्थानमध्ये वाळवंट पाहायला आली होती. पाच दिवसाच्या यात्रेवर ती आली होती. या यात्रेदरम्यान मी तिच्यासोबत होतो. त्यावेळी मी तिला उंटावर कसं बसायचं हे शिकवलं होतं. याच काळात आम्ही एकमेकांवर प्रेम करुन बसलो होतो," असं या सुरक्षा रक्षकाने सांगितलं आहे.

3 / 5
मरीना पूर्ण पाच दिवस राजस्थानमध्ये राहिली होती. त्यानंतर ती पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतली. जाताना माझं तुझ्यावर प्रेम असल्याचं ती या सुरक्षा रक्षकाला म्हणाली होती. पण त्यावेळी सुरक्षा रक्षक तिला उत्तर देऊ शकला नव्हता. मात्र, काही दिवसानंतर तो 30 हजार रुपयांचं कर्ज काढून ऑस्ट्रेलियाच्या मरीनाला भेटायला गेला होता. पण, लग्न करुन ऑस्ट्रेलियातच राहण्याचा मरीनाने आग्रह धरल्यामुळे तिथून निघून आल्याचं या सुरक्षा रक्षकाने सांगितलं.

मरीना पूर्ण पाच दिवस राजस्थानमध्ये राहिली होती. त्यानंतर ती पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतली. जाताना माझं तुझ्यावर प्रेम असल्याचं ती या सुरक्षा रक्षकाला म्हणाली होती. पण त्यावेळी सुरक्षा रक्षक तिला उत्तर देऊ शकला नव्हता. मात्र, काही दिवसानंतर तो 30 हजार रुपयांचं कर्ज काढून ऑस्ट्रेलियाच्या मरीनाला भेटायला गेला होता. पण, लग्न करुन ऑस्ट्रेलियातच राहण्याचा मरीनाने आग्रह धरल्यामुळे तिथून निघून आल्याचं या सुरक्षा रक्षकाने सांगितलं.

4 / 5
  दरम्यान, ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर या माणसाने कुलधारा येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम केलं. तसेच लग्नसुद्धा केलं. सध्या या सुरक्षा रक्षकाला दोन मुलं आहेत. या मुलांची लग्न झालेली आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं. एका दिवशी अचनाक ऑस्ट्रेलियाच्या जुन्या प्रेमिकेचं या सुरक्षा रक्षकाला पत्र आलं. ऑस्ट्रेलियाची मरीना या सुरक्षा रक्षकाला तब्बल 50 वर्षानंतर पुन्हा भेटायला येत आहे. विशेष म्हणजे मरीनाने अजूनही लग्न न केल्याचं हा सुरक्षा रक्षक सांगतोय. तब्बल 50 वर्षानंतर जुनी प्रेमिका त्याला पुन्हा भेटायला येत असल्यामुळे या 82 वर्षीय सुरक्षा रक्षकाला सध्या 21 वर्षांचा तरुण असल्यासारखं वाटत आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर या माणसाने कुलधारा येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम केलं. तसेच लग्नसुद्धा केलं. सध्या या सुरक्षा रक्षकाला दोन मुलं आहेत. या मुलांची लग्न झालेली आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं. एका दिवशी अचनाक ऑस्ट्रेलियाच्या जुन्या प्रेमिकेचं या सुरक्षा रक्षकाला पत्र आलं. ऑस्ट्रेलियाची मरीना या सुरक्षा रक्षकाला तब्बल 50 वर्षानंतर पुन्हा भेटायला येत आहे. विशेष म्हणजे मरीनाने अजूनही लग्न न केल्याचं हा सुरक्षा रक्षक सांगतोय. तब्बल 50 वर्षानंतर जुनी प्रेमिका त्याला पुन्हा भेटायला येत असल्यामुळे या 82 वर्षीय सुरक्षा रक्षकाला सध्या 21 वर्षांचा तरुण असल्यासारखं वाटत आहे.

5 / 5
Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?