AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wayanad Photos : फक्त फोटो उरला… भुस्खलनानंतर हाहा:कार; होतं नव्हतं सर्व गेलं…

केरळातील वायनाड हा जिल्हा आपल्याला राहुल गांधी यांचा लोकसभा मतदार संघ म्हणून परिचित असेल. या वायनाडमध्ये 30 जुलै रोजीची पहाट काळ रात्र ठरली.पावसाने अचानक भूस्खलन झाल्याने येथील घरेच जमीनीने गिळली. आतापर्यंत 150 लोकांचे मृत्यू झाले आहेत. केरळ सरकारने या संकटाला राष्ट्रीय संकट म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर केंद्र सरकारने आम्ही चार वेळा धोक्याचे इशारे दिले होते तरी राज्य सरकार गाफील राहिल्याचे म्हटले आहे. भूस्खलनात आता पर्यंत 98 नागरिक बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन थांबवावे लागले आहे.सीएम कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की मेप्पाडीत 90 तर निलांबुर येथे 32 लोक ठार झाले आहेत. अनेक रुग्णालयात 192 जखमींवर उपचार सुरु आहेत. मेप्पाडीच्या चहाच्या मळ्यात किती लोक राहात होते याची काहीही माहिती प्रशासनाकडे नव्हती. येथे अनेक बाहेरुन आलेल्या राज्यातील मजूर रहात होते. परंतू भूस्खलनाचा फटका बाहेरुन आलेल्या पर्यटकांनाही बसला आहे.

| Updated on: Jul 31, 2024 | 9:07 PM
Share
 30 जुलै रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान जमीन अचानक खचली आणि डोंगरावरुन माती वाहत येऊन घरे जमिनीत गाडली गेली. अनेक जणांचा झोपेतच बळी गेला असावा अशी परिस्थिती आहे. वायनाडच्या चुरालमाला , मुंडाक्कई सारख्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे.

30 जुलै रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान जमीन अचानक खचली आणि डोंगरावरुन माती वाहत येऊन घरे जमिनीत गाडली गेली. अनेक जणांचा झोपेतच बळी गेला असावा अशी परिस्थिती आहे. वायनाडच्या चुरालमाला , मुंडाक्कई सारख्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे.

1 / 10
 केरळासह देशात अनेक ठिकाणी गेल्या काही वर्षांत अचानक मोठा ढगफूटीसारखा पाऊस आणि पूर येत आहे.काल मंगळवारी वायनाड जिल्ह्यात असाच पाऊस अनेक संसार उद्धवस्त करुन गेला. बचाव पथकाचे काम युद्धवेगाने सुरु असले तरी पावसाने अनेक पुल तुटल्याने मोहीमेत अडथळे येत आहेत. लष्कर, नौसेना , वायुसेना, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान दिवसरात्र एक मृतदेह शोधत होते. परंतू आता मोहीम आवरती घ्यावी लागणार आहे.

केरळासह देशात अनेक ठिकाणी गेल्या काही वर्षांत अचानक मोठा ढगफूटीसारखा पाऊस आणि पूर येत आहे.काल मंगळवारी वायनाड जिल्ह्यात असाच पाऊस अनेक संसार उद्धवस्त करुन गेला. बचाव पथकाचे काम युद्धवेगाने सुरु असले तरी पावसाने अनेक पुल तुटल्याने मोहीमेत अडथळे येत आहेत. लष्कर, नौसेना , वायुसेना, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान दिवसरात्र एक मृतदेह शोधत होते. परंतू आता मोहीम आवरती घ्यावी लागणार आहे.

2 / 10
मुंडाक्काई येथील एका वृद्धाने आपबिती सांगितली तो म्हणाला की आम्ही सर्वस्व हरवून बसलो आहोत. आमच्या घरातील कोणीच अजून सापडलेले नाही. या जमिनीवर आम्ही चालतोय खरे परंतू कदाचित याच्या खालीच आमचे जिवलग असतील. काय माहिती ते कुशल असतील की नाही.आता तर फक्त चिखलच दिसत आहे.

मुंडाक्काई येथील एका वृद्धाने आपबिती सांगितली तो म्हणाला की आम्ही सर्वस्व हरवून बसलो आहोत. आमच्या घरातील कोणीच अजून सापडलेले नाही. या जमिनीवर आम्ही चालतोय खरे परंतू कदाचित याच्या खालीच आमचे जिवलग असतील. काय माहिती ते कुशल असतील की नाही.आता तर फक्त चिखलच दिसत आहे.

3 / 10
ज्या डोंगरांवर चहाचे मळे फुलले होते तेथूनच मृत्यू चिखल आणि दगडांना सोबत घेत वाहत खाली घरांवर आला. आपल्या घरात आणि हॉटेलात झोपलेले असलेल्या अनेक जणांना झोपत असताना मृत्यू आपल्या कवेत घेऊन गेला...

ज्या डोंगरांवर चहाचे मळे फुलले होते तेथूनच मृत्यू चिखल आणि दगडांना सोबत घेत वाहत खाली घरांवर आला. आपल्या घरात आणि हॉटेलात झोपलेले असलेल्या अनेक जणांना झोपत असताना मृत्यू आपल्या कवेत घेऊन गेला...

4 / 10
 केरळ पर्यटकांनी नेहमी भरलेले असते. या भुस्खलनात देखील अनेक पर्यटकांना देखील प्राण गमवावे लागले आहेत. वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनानंतर मुंडाक्काई गाव आणि चुरालमाला गाव विरान झाले आहेत. आपल्या संसारातील राहिलेले किडुक मिडुक शोधताना काही जण दिसत आहेत.

केरळ पर्यटकांनी नेहमी भरलेले असते. या भुस्खलनात देखील अनेक पर्यटकांना देखील प्राण गमवावे लागले आहेत. वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनानंतर मुंडाक्काई गाव आणि चुरालमाला गाव विरान झाले आहेत. आपल्या संसारातील राहिलेले किडुक मिडुक शोधताना काही जण दिसत आहेत.

5 / 10
 आतापर्यंत 158 लोक ठार झाले आहेत. तर 186 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जमीनीच्या मातीत अनेक लोक दबलेले असू शकतात. वायनाड उत्तरी केरळाचा भाग असून डोंगराळ परिसरात मोडतो. येथे मोठे जंगल आहे. तीव्र उताराचे डोंगर आणि टेकड्या आहेत. हिरव्याकंच रानातून मध्येच दुधासारखे चमकणारे धबधबेही आहेत.या सौदर्यालाच कोणाची नजर लागली की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आतापर्यंत 158 लोक ठार झाले आहेत. तर 186 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जमीनीच्या मातीत अनेक लोक दबलेले असू शकतात. वायनाड उत्तरी केरळाचा भाग असून डोंगराळ परिसरात मोडतो. येथे मोठे जंगल आहे. तीव्र उताराचे डोंगर आणि टेकड्या आहेत. हिरव्याकंच रानातून मध्येच दुधासारखे चमकणारे धबधबेही आहेत.या सौदर्यालाच कोणाची नजर लागली की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

6 / 10
 मुंडाक्काई आणि चुरालमाला ही गावे नकाशावरुनच नष्ट झाली आहेत. अनेक जागी चिखल आणि दगडांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे  या गावात कधी काळी माणसे राहात होती. हे कळणारच नाही अशी दुरावस्था झाली आहे.

मुंडाक्काई आणि चुरालमाला ही गावे नकाशावरुनच नष्ट झाली आहेत. अनेक जागी चिखल आणि दगडांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या गावात कधी काळी माणसे राहात होती. हे कळणारच नाही अशी दुरावस्था झाली आहे.

7 / 10
 मुंडाक्काई गावात 500 घरे होती त्यातील केवळ 34 ते 50 घरे कशीबशी तगली आहेत. प्रचंड पावसाने मोठा नैसर्गिक संकट ओढवले आणि भुस्खलन झाले. मुंडाक्काई,चुरालमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात सर्वाधिक फटका बसला शेकडो जण धरणीत झोपेतच गाडले गेले.

मुंडाक्काई गावात 500 घरे होती त्यातील केवळ 34 ते 50 घरे कशीबशी तगली आहेत. प्रचंड पावसाने मोठा नैसर्गिक संकट ओढवले आणि भुस्खलन झाले. मुंडाक्काई,चुरालमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात सर्वाधिक फटका बसला शेकडो जण धरणीत झोपेतच गाडले गेले.

8 / 10
 ज्या डोंगरांवर चहाचे मळे फुलले होते तेथूनच मृत्यू चिखल आणि दगडांना सोबत घेत वाहत खाली घरांवर आला. आपल्या घरात आणि हॉटेलात झोपलेले असलेल्या अनेक जणांना झोपत असताना मृत्यू आपल्या कवेत घेऊन गेला.चुरालमाला येथील धबधब्यासाठी खास ओळखला जातो. येथील सुचिप्पारा, वेलोलीपारा हे धबधबे आणि सीता तलाव आदी सौदर्यस्थळे पाहाण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करीत असतात. परंतू ग्लोबल वार्मिंगमुळे कुठेही अचानक ढगफूटी सदृश्य पाऊस होत असून सर्व होत्याचे नव्हते होत आहे.

ज्या डोंगरांवर चहाचे मळे फुलले होते तेथूनच मृत्यू चिखल आणि दगडांना सोबत घेत वाहत खाली घरांवर आला. आपल्या घरात आणि हॉटेलात झोपलेले असलेल्या अनेक जणांना झोपत असताना मृत्यू आपल्या कवेत घेऊन गेला.चुरालमाला येथील धबधब्यासाठी खास ओळखला जातो. येथील सुचिप्पारा, वेलोलीपारा हे धबधबे आणि सीता तलाव आदी सौदर्यस्थळे पाहाण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करीत असतात. परंतू ग्लोबल वार्मिंगमुळे कुठेही अचानक ढगफूटी सदृश्य पाऊस होत असून सर्व होत्याचे नव्हते होत आहे.

9 / 10
आपल्या आप्तांना शोधण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करीत आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीला देखील हातभार लावत आहेत. चिखलात  तिघा जणांचा फोटो मिळाला आहे. त्यांच्या घरातील कोणीही सापडले नाही.घराची भिंत तोडून येथे दगड माती घरात शिरल्याचे विदारक दृश्य पाहणाऱ्या जीवाची कालवाकालव करीत आहे.

आपल्या आप्तांना शोधण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करीत आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीला देखील हातभार लावत आहेत. चिखलात तिघा जणांचा फोटो मिळाला आहे. त्यांच्या घरातील कोणीही सापडले नाही.घराची भिंत तोडून येथे दगड माती घरात शिरल्याचे विदारक दृश्य पाहणाऱ्या जीवाची कालवाकालव करीत आहे.

10 / 10
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.