या योजनेंतर्गत भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल केले जातील. त्या अंतर्गत सैनिकांची भरती सुरुवातीला चार वर्षांच्या कालावधीसाठी असेल, परंतु त्यापैकी काहीजणांना कायम ठेवण्यात येईल
लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने नुकतीच ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यात आली आहे .
1 / 5
या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
2 / 5
या योजनांतर्गत यंदा तब्बल 46,000 जणांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती करण्यात येणार आहे. भरती तीन महिन्यांतच सुरू होणार आहे. या योजनेत अत्यंत तरुणवयात संधी मिळणार आहे. यासाठी वयाची साडेसतरा ते 21 ही वय असलेल्या तरुणांना सहभागी होत येणार आहे.
3 / 5
या योजनेअंर्तगत भरती होणाऱ्या ‘अग्निवीरां’ना पहिल्या वर्षी मासिक 30 हजार रुपये मोबदला मिळेल़. दुसऱ्या वर्षी 33,ooo तिसऱ्या वर्षी 36, 500 आणि चौथ्या वर्षी 4000 मोबदला मिळणार आह़े
4 / 5
याबरोबरच प्रत्येक ‘अग्निवीरा’ला 11 लाख 47 हजार रुपये सेवानिधी मिळणार आहे, हे उत्पन्न करमुक्त असणार आहे.अग्निवीरां’ना सेवाकाळात 48 लाखांचे विमाकवची सुविधा असणार आहे.