AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात यश, पैसा , उत्तम आरोग्य हवे असेल तर, चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी कराच

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा स्वत:वर कधी परिणाम होऊ दिला नाही. त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव त्यांनी चाणक्य नीतीमधून सर्वांसमोर मांडले. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कठोर वाटत असल्या तरी त्या गोष्टींचा आपल्याला आयुष्यात खूप फायदा होतो. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी माणसांनी तरुण वयामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात याबद्दल माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 7:51 AM
Share
अनेक वेळा तरुणाई आपल्या तारुण्यात अनेक वाईट सवयी अंगीकारतात. यामुळे ते आपल्या ध्येयापासून विचलित तर होतातच शिवाय मानसिक तणावाखालीही राहतात. चाणक्य नीतीनुसार तरुणपणात काय काळजी घ्यावी.

अनेक वेळा तरुणाई आपल्या तारुण्यात अनेक वाईट सवयी अंगीकारतात. यामुळे ते आपल्या ध्येयापासून विचलित तर होतातच शिवाय मानसिक तणावाखालीही राहतात. चाणक्य नीतीनुसार तरुणपणात काय काळजी घ्यावी.

1 / 4
आत्मविश्वास - चाणक्य नीतीनुसार, जीवनात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. या जगात जर तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा तर तो 'स्वत:वर'. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही आयुष्यात खूप काही मिळवू शकता. जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल पण आत्मविश्वास नसेल तर अशा ज्ञानाचा आयुष्यात काहीच फायदा होत नाही.

आत्मविश्वास - चाणक्य नीतीनुसार, जीवनात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. या जगात जर तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा तर तो 'स्वत:वर'. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही आयुष्यात खूप काही मिळवू शकता. जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल पण आत्मविश्वास नसेल तर अशा ज्ञानाचा आयुष्यात काहीच फायदा होत नाही.

2 / 4
 शिस्त - चाणक्य नीतीनुसार तरुणांमध्ये शिस्तीचे खूप महत्त्व आहे. जे तरुण आपल्या जीवनात शिस्तीचे पालन करतात ते जीवनात उंची गाठतात. त्यामुळे प्रत्येक काम वेळेत पूर्ण करणे ही एक चांगली सवय आहे. आयुष्यात आपण वेळेचे महत्त्व पाळले पाहीजे. जेव्हा आपण वेळेला किंमत देतो तेव्हा आपण यशाची एक पायरी चढलेलो असतो. वेळेचे महत्त्व जाणणाऱ्या लोकांना यश  मिळेवणे ही गोष्ट कठीण नसते.

शिस्त - चाणक्य नीतीनुसार तरुणांमध्ये शिस्तीचे खूप महत्त्व आहे. जे तरुण आपल्या जीवनात शिस्तीचे पालन करतात ते जीवनात उंची गाठतात. त्यामुळे प्रत्येक काम वेळेत पूर्ण करणे ही एक चांगली सवय आहे. आयुष्यात आपण वेळेचे महत्त्व पाळले पाहीजे. जेव्हा आपण वेळेला किंमत देतो तेव्हा आपण यशाची एक पायरी चढलेलो असतो. वेळेचे महत्त्व जाणणाऱ्या लोकांना यश मिळेवणे ही गोष्ट कठीण नसते.

3 / 4
अंमली पदार्थांपासून दूर राहा  - अनेक वेळा अनेक तरुण चुकीच्या सवयी लावतात. त्याचा त्यांच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे पैशाचा अपव्यय तर होतोच शिवाय आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा वाईट सवयींना कधीही लागू नका. अंमली पदार्थांपासून तुम्हाला क्षणीक आनंद मिळतो पण तुम्ही आयुष्यातील महत्त्वाची वेळ वाया घालवत असता हे लक्षात असू द्या.

अंमली पदार्थांपासून दूर राहा - अनेक वेळा अनेक तरुण चुकीच्या सवयी लावतात. त्याचा त्यांच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे पैशाचा अपव्यय तर होतोच शिवाय आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा वाईट सवयींना कधीही लागू नका. अंमली पदार्थांपासून तुम्हाला क्षणीक आनंद मिळतो पण तुम्ही आयुष्यातील महत्त्वाची वेळ वाया घालवत असता हे लक्षात असू द्या.

4 / 4
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....