AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga: तिसरे महायुद्ध आणि भारतात घटणार एकपेक्षा एक भयानक घटना, 2026साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी

Baba Vanga Prediction: प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 5079 पर्यंत जगात काय होणार याविषयी सांगितले आहे. आता त्यांनी यंदाच्या वर्षात काय होणार हे सांगितले आहे ते जाणून घेऊया...

| Updated on: Oct 07, 2025 | 3:35 PM
Share
नेत्रहीन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या भाकितांनी जगभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये भीती, रहस्य आणि उत्साह यांचा समावेश आहे, ज्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरतात.

नेत्रहीन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या भाकितांनी जगभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये भीती, रहस्य आणि उत्साह यांचा समावेश आहे, ज्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरतात.

1 / 8
जरी बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले असले तरी, त्यांनी इ.स. 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्याचा दावा केला जातो. मात्र, यासंदर्भात कोणतेही लिखित पुरावे किंवा दस्तऐवज उपलब्ध नाहीत.

जरी बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले असले तरी, त्यांनी इ.स. 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्याचा दावा केला जातो. मात्र, यासंदर्भात कोणतेही लिखित पुरावे किंवा दस्तऐवज उपलब्ध नाहीत.

2 / 8
बाबा वेंगाच्या भाकितांमध्ये नैसर्गिक आपत्ती, तिसरे महायुद्ध, मानवजातीचे पतन आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती यांचा समावेश आहे. 2026 या वर्षासाठीच्या त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दल सोशल मीडियावर प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

बाबा वेंगाच्या भाकितांमध्ये नैसर्गिक आपत्ती, तिसरे महायुद्ध, मानवजातीचे पतन आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती यांचा समावेश आहे. 2026 या वर्षासाठीच्या त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दल सोशल मीडियावर प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

3 / 8
बाबा वेंगा यांच्या मते, 2026 ते 2028 या कालावधीत जागतिक स्तरावर दुष्काळ आणि भूकबळीच्या समस्यांचा अंत होईल. चीन आर्थिक आणि लष्करी शक्तीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती होईल. इतकेच नव्हे, तर याच काळात तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

बाबा वेंगा यांच्या मते, 2026 ते 2028 या कालावधीत जागतिक स्तरावर दुष्काळ आणि भूकबळीच्या समस्यांचा अंत होईल. चीन आर्थिक आणि लष्करी शक्तीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती होईल. इतकेच नव्हे, तर याच काळात तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

4 / 8
बाबा वेंगा यांच्या खऱ्या ठरलेल्या काही भविष्यवाण्यांमध्ये कुर्स्क पाणबुडी अपघात, आयसिसचा उदय, सिरियातील रासायनिक हल्ला, ब्रेक्झिट, 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि राजकुमारी डायना यांचे निधन यांचा समावेश आहे.

बाबा वेंगा यांच्या खऱ्या ठरलेल्या काही भविष्यवाण्यांमध्ये कुर्स्क पाणबुडी अपघात, आयसिसचा उदय, सिरियातील रासायनिक हल्ला, ब्रेक्झिट, 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि राजकुमारी डायना यांचे निधन यांचा समावेश आहे.

5 / 8
भारताबाबत बोलायचे झाले तर, बाबा वेंगा यांनी अतिवृष्टी, पूर, भूस्खलन आणि तापमानवाढीच्या संकटांचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, देशातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, ज्याचा भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होईल.

भारताबाबत बोलायचे झाले तर, बाबा वेंगा यांनी अतिवृष्टी, पूर, भूस्खलन आणि तापमानवाढीच्या संकटांचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, देशातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, ज्याचा भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होईल.

6 / 8
विशेष म्हणजे, वैज्ञानिक या भविष्यवाण्यांना स्पष्टपणे नाकारतात. याची दोन मुख्य कारणे आहेत: एक, या भविष्यवाण्यांचा कोणताही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नाही; आणि दुसरे, अनेक भाकितं कालमर्यादेशी संबंधित असल्याने ती योगायोगाने खरी ठरल्याचे मानले जाते.

विशेष म्हणजे, वैज्ञानिक या भविष्यवाण्यांना स्पष्टपणे नाकारतात. याची दोन मुख्य कारणे आहेत: एक, या भविष्यवाण्यांचा कोणताही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नाही; आणि दुसरे, अनेक भाकितं कालमर्यादेशी संबंधित असल्याने ती योगायोगाने खरी ठरल्याचे मानले जाते.

7 / 8
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.