AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांना दिलेल्या वचनामुळे मी गप्प..; ‘ये रिश्ता..’च्या निर्मात्यांसोबतच्या वादावर काय म्हणाली हिना?

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अभिनेत्री हिना खानने सहा वर्षे अक्षराची भूमिका साकारली होती. मालिका सोडताना तिचा निर्मात्यांसोबत वाद झाला होता. निर्मात्यांच्या आरोपांवर तिने आता प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Jun 06, 2024 | 4:00 PM
Share
अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचली. ही तिच्या करिअरमधील पहिलीची मालिका होती. मात्र सहा वर्षांनंतर तिने त्यातून काढता पाय घेतला होता. मालिका सोडताना हिनाचा निर्माते राजन शाही यांच्यासोबत वाद झाला होता.

अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचली. ही तिच्या करिअरमधील पहिलीची मालिका होती. मात्र सहा वर्षांनंतर तिने त्यातून काढता पाय घेतला होता. मालिका सोडताना हिनाचा निर्माते राजन शाही यांच्यासोबत वाद झाला होता.

1 / 7
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राजन शाही यांनी हिनाचं मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. "मालिकेत आलेल्या लीपमुळे हिना खुश नव्हती. म्हणून ती सतत स्क्रीप्टमध्ये हस्तक्षेप करत होती. इतकंच नव्हे तर शिवांगी जोशीचं महत्त्व वाढवणारे डायलॉग्स बोलण्यास तिने नकार दिला होता", असं ते म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राजन शाही यांनी हिनाचं मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. "मालिकेत आलेल्या लीपमुळे हिना खुश नव्हती. म्हणून ती सतत स्क्रीप्टमध्ये हस्तक्षेप करत होती. इतकंच नव्हे तर शिवांगी जोशीचं महत्त्व वाढवणारे डायलॉग्स बोलण्यास तिने नकार दिला होता", असं ते म्हणाले होते.

2 / 7
"मी तिला बजावलं होतं की जे सीन्स जसे आहेत, तुला तसेच शूट करावे लागतील. त्याला तिने स्पष्ट नकार दिला. तेव्हा मी सुनावलं की शूट पूर्ण कर किंवा सेटवरून निघून जा. त्यादिवशी ती पूर्ण दिवस मेकअप रुममध्ये बसली होती. रात्री जेव्हा ती सेटवरून गेली, तेव्हा तिला मेसेज करण्यात आला की तिला यापुढे सेटवर यायची गरज नाही. तिचा करार रद्द करण्यात आला आहे", अशी बाजू राजन शाही यांनी सांगितली होती.

"मी तिला बजावलं होतं की जे सीन्स जसे आहेत, तुला तसेच शूट करावे लागतील. त्याला तिने स्पष्ट नकार दिला. तेव्हा मी सुनावलं की शूट पूर्ण कर किंवा सेटवरून निघून जा. त्यादिवशी ती पूर्ण दिवस मेकअप रुममध्ये बसली होती. रात्री जेव्हा ती सेटवरून गेली, तेव्हा तिला मेसेज करण्यात आला की तिला यापुढे सेटवर यायची गरज नाही. तिचा करार रद्द करण्यात आला आहे", अशी बाजू राजन शाही यांनी सांगितली होती.

3 / 7
राजन शाही यांच्या आरोपांवर आता हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. "मी कधीच कोणाविषयी वाईट बोलत नाही. माझ्या मनात राजन शाही यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते माझ्याबद्दल असं का म्हणाले माहीत नाही. त्यांनी मला करिअरमधील पहिली संधी दिली होती", असं हिना म्हणाली.

राजन शाही यांच्या आरोपांवर आता हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. "मी कधीच कोणाविषयी वाईट बोलत नाही. माझ्या मनात राजन शाही यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते माझ्याबद्दल असं का म्हणाले माहीत नाही. त्यांनी मला करिअरमधील पहिली संधी दिली होती", असं हिना म्हणाली.

4 / 7
याविषयी तिने पुढे सांगितलं, "मी जेव्हा 'ये रिश्ता..' ही मालिका सोडली, तेव्हा माझे वडील खूप निराश होते. इतकी वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडताना काही गोष्टी सकारात्मकदृष्ट्या संपल्या नाहीत. वडिलांनी माझ्याकडून वचन मागितलं होतं की, मी कधीच त्या मालिकेविषयी वाईट बोलणार नाही."

याविषयी तिने पुढे सांगितलं, "मी जेव्हा 'ये रिश्ता..' ही मालिका सोडली, तेव्हा माझे वडील खूप निराश होते. इतकी वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडताना काही गोष्टी सकारात्मकदृष्ट्या संपल्या नाहीत. वडिलांनी माझ्याकडून वचन मागितलं होतं की, मी कधीच त्या मालिकेविषयी वाईट बोलणार नाही."

5 / 7
"मी त्या मालिकेविषयी आणि त्याच्याशी जोडलेल्या कोणत्याच व्यक्तीविषयी मी कधीच काही बोलू नये, असं त्यांनी वचन मागितलं होतं. तेव्हापासून मी त्याच वचनावर कायम आहे. आता माझे वडील आयुष्यात नाहीत, तर मी हे वचन कसं तोडू शकते", असं हिना पुढे म्हणाली.

"मी त्या मालिकेविषयी आणि त्याच्याशी जोडलेल्या कोणत्याच व्यक्तीविषयी मी कधीच काही बोलू नये, असं त्यांनी वचन मागितलं होतं. तेव्हापासून मी त्याच वचनावर कायम आहे. आता माझे वडील आयुष्यात नाहीत, तर मी हे वचन कसं तोडू शकते", असं हिना पुढे म्हणाली.

6 / 7
अखेर तिने असं स्पष्ट केलं, "हे गरजेचं नाही जे लोक जास्त बोलतात, ते नेहमीच खरे असतात. त्याचप्रमाणे हेसुद्धा गरजेचं नाही की जे लोक कमी बोलतात, ते चुकीचे असतात."

अखेर तिने असं स्पष्ट केलं, "हे गरजेचं नाही जे लोक जास्त बोलतात, ते नेहमीच खरे असतात. त्याचप्रमाणे हेसुद्धा गरजेचं नाही की जे लोक कमी बोलतात, ते चुकीचे असतात."

7 / 7
Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर