AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात डेंग्यूचा हाहा:कार, मनपाचं दुर्लक्ष; एका माजी नगरसेवकाने केलं असं काही…

जळगावमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून, आतापर्यंत ८ रुग्ण आणि २०० संशयित रुग्ण आढळले आहेत. संभाजीनगर परिसरात डेंग्यूचा प्रसार चिंतेचा विषय बनला आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी स्वतःहून फवारणी मोहीम हाती घेतली आहे.

| Updated on: Jul 24, 2025 | 4:23 PM
Share
जळगाव शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जळगावात आतापर्यंत ८ डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर सुमारे २०० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

जळगाव शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जळगावात आतापर्यंत ८ डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर सुमारे २०० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

1 / 8
विशेषतः संभाजीनगर परिसरात डेंग्यूचा एक रुग्ण आढळल्याने या भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता, महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

विशेषतः संभाजीनगर परिसरात डेंग्यूचा एक रुग्ण आढळल्याने या भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता, महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

2 / 8
याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी पुढाकार घेऊन संभाजीनगरसह परिसरातील विविध भागांमध्ये प्रतिबंधात्मक फवारणी मोहीम हाती घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी पुढाकार घेऊन संभाजीनगरसह परिसरातील विविध भागांमध्ये प्रतिबंधात्मक फवारणी मोहीम हाती घेतली आहे.

3 / 8
संभाजीनगरमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर, जितेंद्र मराठे यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या माध्यमातून परिसरातील मोकळे भूखंड, अपार्टमेंट्स आणि घराघरात जाऊन डेंग्यू प्रतिबंधक फवारणी केली जात आहे.

संभाजीनगरमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर, जितेंद्र मराठे यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या माध्यमातून परिसरातील मोकळे भूखंड, अपार्टमेंट्स आणि घराघरात जाऊन डेंग्यू प्रतिबंधक फवारणी केली जात आहे.

4 / 8
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे आवश्यक असते. त्यामुळे ही फवारणी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे आवश्यक असते. त्यामुळे ही फवारणी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

5 / 8
छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूची साथ पसरत असतानाही महापालिकेकडून पाहिजे त्या प्रमाणात फवारणी आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूची साथ पसरत असतानाही महापालिकेकडून पाहिजे त्या प्रमाणात फवारणी आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

6 / 8
अशा परिस्थितीत, माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांचा हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे संभाजीनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अशा परिस्थितीत, माजी नगरसेवक जितेंद्र मराठे यांचा हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे संभाजीनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

7 / 8
 सध्या डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता, महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि शहरातील इतर भागांमध्येही फवारणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सध्या डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता, महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि शहरातील इतर भागांमध्येही फवारणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.