AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांनी कर्ज घेतले असेल आणि परतफेड करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला, तर मुलाला कर्ज फेडावं लागतं का?

वडिलांच्या निधनानंतर मुलावर त्यांच्या कर्जाची जबाबदारी येते का याबाबत अनेक शंका असतात. भारतीय कायद्यानुसार, मुलगा वैयक्तिकरित्या जबाबदार नाही, परंतु वारशाच्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत जबाबदारी येऊ शकते.

| Updated on: Apr 11, 2025 | 3:09 PM
Share
वडिलांनी घेतलेले कर्ज त्यांच्या निधनानंतर मुलाला फेडावे लागते का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या प्रश्नावरुन अनेकदा लोकांमध्ये संभ्रमही निर्माण होतो. पण तुम्हाला माहितीये का? भारतीय कायद्यानुसार, वडिलांच्या कर्जासाठी मुलगा वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत त्याला वडिलांचे कर्ज फेडावे लागू शकते.

वडिलांनी घेतलेले कर्ज त्यांच्या निधनानंतर मुलाला फेडावे लागते का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या प्रश्नावरुन अनेकदा लोकांमध्ये संभ्रमही निर्माण होतो. पण तुम्हाला माहितीये का? भारतीय कायद्यानुसार, वडिलांच्या कर्जासाठी मुलगा वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत त्याला वडिलांचे कर्ज फेडावे लागू शकते.

1 / 9
भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ नुसार, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेतून कर्जाची परतफेड केली जाते. जर मुलाने कर्जाची हमी दिली नसेल किंवा त्याला वडिलांच्या मालमत्तेचा लाभ मिळाला नसेल, तर त्याला वैयक्तिकरित्या कर्ज फेडण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही.

भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ नुसार, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेतून कर्जाची परतफेड केली जाते. जर मुलाने कर्जाची हमी दिली नसेल किंवा त्याला वडिलांच्या मालमत्तेचा लाभ मिळाला नसेल, तर त्याला वैयक्तिकरित्या कर्ज फेडण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही.

2 / 9
भारतीय करार कायदा १८७२ नुसार, कर्जाची जबाबदारी फक्त करार केलेल्या व्यक्तीवरच असते. त्यामुळे, जर मुलगा वडिलांच्या कर्जासाठी जामीनदार नसेल, तर तो वैयक्तिकरित्या यासाठी जबाबदार ठरत नाही.

भारतीय करार कायदा १८७२ नुसार, कर्जाची जबाबदारी फक्त करार केलेल्या व्यक्तीवरच असते. त्यामुळे, जर मुलगा वडिलांच्या कर्जासाठी जामीनदार नसेल, तर तो वैयक्तिकरित्या यासाठी जबाबदार ठरत नाही.

3 / 9
जर वडिलांनी कर्ज घेतले आणि मालमत्ता सोडली, तर मुलगा त्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत कर्ज फेडण्यास जबाबदार असतो. पण जर वडिलांनी कर्ज घेतले असेल आणि कोणतीही मालमत्ता सोडली नसेल, तर मुलावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येत नाही. तसेच जर मुलगा वडिलांच्या कर्जासाठी जामीनदार असेल, तर तो वैयक्तिकरित्या पूर्णपणे यासाठी जबाबदार असतो.

जर वडिलांनी कर्ज घेतले आणि मालमत्ता सोडली, तर मुलगा त्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत कर्ज फेडण्यास जबाबदार असतो. पण जर वडिलांनी कर्ज घेतले असेल आणि कोणतीही मालमत्ता सोडली नसेल, तर मुलावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येत नाही. तसेच जर मुलगा वडिलांच्या कर्जासाठी जामीनदार असेल, तर तो वैयक्तिकरित्या पूर्णपणे यासाठी जबाबदार असतो.

4 / 9
सर्वोच्च न्यायालयाने के. राजामौली विरुद्ध एव्हीकेएन स्वामी (२००१) याप्रकरणी याबद्दल स्पष्ट मत नमूद केले होते. जर वारसाला कोणतीही मालमत्ता मिळाली नसेल, तर तो कर्जासाठी जबाबदार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने के. राजामौली विरुद्ध एव्हीकेएन स्वामी (२००१) याप्रकरणी याबद्दल स्पष्ट मत नमूद केले होते. जर वारसाला कोणतीही मालमत्ता मिळाली नसेल, तर तो कर्जासाठी जबाबदार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले होते.

5 / 9
सीआयटी विरुद्ध स्वर्गीय ओमप्रकाश झुनझुनवाला यांच्या इस्टेट (२००२) प्रकरणातही न्यायालयाने वारसाची जबाबदारी केवळ मृत व्यक्तीकडून मिळालेल्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत असल्याचे नमूद केले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, जर एखाद्या वारसाला मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा फायदा होत असेल, तर तो मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत कर्ज देण्यास जबाबदार असतो, वैयक्तिकरित्या नाही.

सीआयटी विरुद्ध स्वर्गीय ओमप्रकाश झुनझुनवाला यांच्या इस्टेट (२००२) प्रकरणातही न्यायालयाने वारसाची जबाबदारी केवळ मृत व्यक्तीकडून मिळालेल्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत असल्याचे नमूद केले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, जर एखाद्या वारसाला मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा फायदा होत असेल, तर तो मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत कर्ज देण्यास जबाबदार असतो, वैयक्तिकरित्या नाही.

6 / 9
हिंदू कायद्यानुसार, जर वडिलोपार्जित मालमत्तेवर धर्मादाय, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणांसाठी कर्ज घेतले गेले असेल, तर काही विशिष्ट परिस्थितीत वारसांना मालमत्तेतून ते कर्ज फेडावे लागते.

हिंदू कायद्यानुसार, जर वडिलोपार्जित मालमत्तेवर धर्मादाय, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणांसाठी कर्ज घेतले गेले असेल, तर काही विशिष्ट परिस्थितीत वारसांना मालमत्तेतून ते कर्ज फेडावे लागते.

7 / 9
थोडक्यात, वडिलांच्या कर्जासाठी मुलगा वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो. त्याला वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंतच त्याला जबाबदार धरले जाते. जर त्याला कोणतीही मालमत्ता मिळाली नसेल, तर त्याच्यावर कोणतेही दायित्व नसते.

थोडक्यात, वडिलांच्या कर्जासाठी मुलगा वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो. त्याला वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंतच त्याला जबाबदार धरले जाते. जर त्याला कोणतीही मालमत्ता मिळाली नसेल, तर त्याच्यावर कोणतेही दायित्व नसते.

8 / 9
येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि लेखांवर आधारित आहे. येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. आपल्या विशिष्ट परिस्थितीत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनुभवी वकिलाशी संपर्क साधावा.

येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि लेखांवर आधारित आहे. येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. आपल्या विशिष्ट परिस्थितीत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनुभवी वकिलाशी संपर्क साधावा.

9 / 9
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.