AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

'मुरांबा' मालिकेत रमासमोर अक्षयचं नवं प्रेम येणार आहे. स्वरा असं तिचं नाव असून प्रसिद्ध अभिनेत्री ही भूमिका साकारणार आहे. या मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या मुख्य भूमिका असून दररोज दुपारी 1.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jan 08, 2026 | 12:32 PM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मालिका गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मालिका गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

1 / 5
सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास 16 वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. स्वरा या पात्राविषयी सांगताना सुरुची म्हणाली, "साधारण 16 वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्या 'ओळख' या मालिकेनं मला अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने ओळख दिली होती."

सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास 16 वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. स्वरा या पात्राविषयी सांगताना सुरुची म्हणाली, "साधारण 16 वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्या 'ओळख' या मालिकेनं मला अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने ओळख दिली होती."

2 / 5
"पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबात येताना मला अतिशय आनंद होतोय. खरंतर मला सकारात्मक व्यक्तिरेखा साकारायची होती आणि तेव्हा स्वरा या भूमिकेसाठी विचारणा झाली. स्वरा अतिशय सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी आहे," असं तिने भूमिकेविषयी सांगितलं.

"पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबात येताना मला अतिशय आनंद होतोय. खरंतर मला सकारात्मक व्यक्तिरेखा साकारायची होती आणि तेव्हा स्वरा या भूमिकेसाठी विचारणा झाली. स्वरा अतिशय सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी आहे," असं तिने भूमिकेविषयी सांगितलं.

3 / 5
याविषयी ती पुढे म्हणाली, "प्रचंड हळवी असल्यामुळे तिच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्या माणसांनी कधी दूर जाऊ नये असं स्वराचं मत आहे. त्यामुळे रमा-अक्षयच्या नात्यात स्वराच्या येण्याने नेमकं काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे."

याविषयी ती पुढे म्हणाली, "प्रचंड हळवी असल्यामुळे तिच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्या माणसांनी कधी दूर जाऊ नये असं स्वराचं मत आहे. त्यामुळे रमा-अक्षयच्या नात्यात स्वराच्या येण्याने नेमकं काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे."

4 / 5
'मुरांबा' मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. सात वर्षांपूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय दुरावले होते. या लीपनंतर मालिकेत रमाचा नवीन लूक पहायला मिळतोय.

'मुरांबा' मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. सात वर्षांपूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय दुरावले होते. या लीपनंतर मालिकेत रमाचा नवीन लूक पहायला मिळतोय.

5 / 5
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका.
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला.
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान.
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात.
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप.
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....