AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : रोहित शर्मासमोर धोनी-कोहलीही फेल, मुंबई इंडियन्ससमोर CSK-RCB कितीवेळा हरली?

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चा दुसरा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल.

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 16, 2021 | 9:43 AM
Share
दुबई : अर्धवट राहिलेल्या IPL 2021 चा रणसंग्राम पुन्हा एकदा सुरु होणार आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल 2021 चा थरार सुरु होईल. आठ संघांमधील चॅम्पियन होण्याची शर्यत सुरू होईल. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिली लढाई होणार आहे. कोरोनामुळे मे महिन्यात जेव्हा स्पर्धा थांबवण्यात आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा संघ आघाडीवर होता. तर दुसऱ्या क्रमांकावर धोनीची चेन्नई. मुंबईने प्रत्येक वेळेप्रमाणे संथ सुरुवात केली आणि नंतर लयीत येत असल्याचं दिसून आले. आयपीएलचा हा 14 वा हंगाम आहे . एका टीमने कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवले, त्यावर एक नजर

दुबई : अर्धवट राहिलेल्या IPL 2021 चा रणसंग्राम पुन्हा एकदा सुरु होणार आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल 2021 चा थरार सुरु होईल. आठ संघांमधील चॅम्पियन होण्याची शर्यत सुरू होईल. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिली लढाई होणार आहे. कोरोनामुळे मे महिन्यात जेव्हा स्पर्धा थांबवण्यात आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा संघ आघाडीवर होता. तर दुसऱ्या क्रमांकावर धोनीची चेन्नई. मुंबईने प्रत्येक वेळेप्रमाणे संथ सुरुवात केली आणि नंतर लयीत येत असल्याचं दिसून आले. आयपीएलचा हा 14 वा हंगाम आहे . एका टीमने कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवले, त्यावर एक नजर

1 / 7
या यादीत मुंबई इंडियन्सचे नाव सर्वात वर येते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ जेव्हाही मैदानात उतरतो, तो केकेआरविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार असतो. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबईने 22 सामने जिंकले आहेत. आयपीएलमधील संघाविरुद्ध कोणत्याही संघाने सर्वाधिक विजय मिळवण्याचा हा विक्रम आहे. या दोन संघांमध्ये एकूण 28 सामने झाले आहेत. त्यामुळे केकेआरने केवळ सहा सामने जिंकले आहेत, उरलेले 22 सामने मुंबईने आपल्या नावे केले.

या यादीत मुंबई इंडियन्सचे नाव सर्वात वर येते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ जेव्हाही मैदानात उतरतो, तो केकेआरविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार असतो. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबईने 22 सामने जिंकले आहेत. आयपीएलमधील संघाविरुद्ध कोणत्याही संघाने सर्वाधिक विजय मिळवण्याचा हा विक्रम आहे. या दोन संघांमध्ये एकूण 28 सामने झाले आहेत. त्यामुळे केकेआरने केवळ सहा सामने जिंकले आहेत, उरलेले 22 सामने मुंबईने आपल्या नावे केले.

2 / 7
दुसऱ्या क्रमांकावरही मुंबई इंडियन्सचे नाव आहे. मुंबईने आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 19 सामने जिंकले आहेत. धोनीच्या संघाचा आयपीएलमध्ये आश्चर्यकारक विक्रम असला, तरी रोहित शर्मासमोर चेन्नईचे शेर ढेर होतात. मुंबईने चेन्नईला साखळी फेरीत तर हरवलंच आहे, पण फायनलमध्येही तब्बल तीनवेळा हरवून थेट आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.  मुंबई आणि चेन्नईत एकूण 31 सामने झाले आहेत. त्यापैकी 12 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला. मात्र 2019 च्या आयपीएलपूर्वी दोन्ही संघ बरोबरीत होते. पण आयपीएल 2019 मध्ये मुंबईने सलग चार सामने जिंकले आणि आघाडी घेतली. दोन्ही संघांमधील गेल्या सात सामन्यांत मुंबईने सहा विजय मिळवले आहेत.

दुसऱ्या क्रमांकावरही मुंबई इंडियन्सचे नाव आहे. मुंबईने आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 19 सामने जिंकले आहेत. धोनीच्या संघाचा आयपीएलमध्ये आश्चर्यकारक विक्रम असला, तरी रोहित शर्मासमोर चेन्नईचे शेर ढेर होतात. मुंबईने चेन्नईला साखळी फेरीत तर हरवलंच आहे, पण फायनलमध्येही तब्बल तीनवेळा हरवून थेट आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. मुंबई आणि चेन्नईत एकूण 31 सामने झाले आहेत. त्यापैकी 12 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला. मात्र 2019 च्या आयपीएलपूर्वी दोन्ही संघ बरोबरीत होते. पण आयपीएल 2019 मध्ये मुंबईने सलग चार सामने जिंकले आणि आघाडी घेतली. दोन्ही संघांमधील गेल्या सात सामन्यांत मुंबईने सहा विजय मिळवले आहेत.

3 / 7
कोलकाता नाईट रायडर्सचा विक्रम मुंबई इंडियन्सविरुद्ध भलेही चांगला नाही. पण केकेआरचा संघ पंजाब किंग्जविरुद्ध तुफान कामगिरी करतो. प्रीती झिंटाच्या मालकीच्या संघाविरुद्ध केकेआरने 19 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांनी 28 सामने खेळले. पण पंजाबला केवळ नऊ सामन्यांतच यश मिळवता आले.

कोलकाता नाईट रायडर्सचा विक्रम मुंबई इंडियन्सविरुद्ध भलेही चांगला नाही. पण केकेआरचा संघ पंजाब किंग्जविरुद्ध तुफान कामगिरी करतो. प्रीती झिंटाच्या मालकीच्या संघाविरुद्ध केकेआरने 19 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांनी 28 सामने खेळले. पण पंजाबला केवळ नऊ सामन्यांतच यश मिळवता आले.

4 / 7
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अद्याप आयपीएलचा एकही किताब जिंकू शकलेला नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे तगड्या  संघांसमोर त्यांचा खराब रेकॉर्ड आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघांनी आतापर्यंत आरसीबीला 17-17 वेळा पराभूत केले आहे. या संघांनी आरसीबीला जितके पराभूत केले आहे, तितके इतर कोणालाही पराभूत करता आले नाही. मुंबई आणि बंगळुरु 27 वेळा एकमेकांसमोर आले. यामध्ये कोहलीचा संघ केवळ 10 वेळा जिंकू शकला. दुसरीकडे, चेन्नई आणि बंगळुरुमध्ये  28 सामने झाले. यामध्ये आरसीबीला केवळ 9 सामने जिंकता आले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अद्याप आयपीएलचा एकही किताब जिंकू शकलेला नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे तगड्या संघांसमोर त्यांचा खराब रेकॉर्ड आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघांनी आतापर्यंत आरसीबीला 17-17 वेळा पराभूत केले आहे. या संघांनी आरसीबीला जितके पराभूत केले आहे, तितके इतर कोणालाही पराभूत करता आले नाही. मुंबई आणि बंगळुरु 27 वेळा एकमेकांसमोर आले. यामध्ये कोहलीचा संघ केवळ 10 वेळा जिंकू शकला. दुसरीकडे, चेन्नई आणि बंगळुरुमध्ये 28 सामने झाले. यामध्ये आरसीबीला केवळ 9 सामने जिंकता आले.

5 / 7
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा विक्रमही चांगला आहे. मुंबईने दिल्लीविरुद्ध 16 सामने जिंकले आहेत. यापैकी आयपीएल 2020 मध्ये चार सामने जिंकले होते. गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने सर्व संघांना पराभूत केले होते. परंतु प्रत्येक वेळी मुंबईकडून पराभूत झाले. दोघेही शेवटचे चार सामने खेळले. या संघांनी 29 वेळा एकमेकांचा सामना केला. पण दिल्लीला मुंबईसमोर 13 वेळा झुकावं लागलं.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा विक्रमही चांगला आहे. मुंबईने दिल्लीविरुद्ध 16 सामने जिंकले आहेत. यापैकी आयपीएल 2020 मध्ये चार सामने जिंकले होते. गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने सर्व संघांना पराभूत केले होते. परंतु प्रत्येक वेळी मुंबईकडून पराभूत झाले. दोघेही शेवटचे चार सामने खेळले. या संघांनी 29 वेळा एकमेकांचा सामना केला. पण दिल्लीला मुंबईसमोर 13 वेळा झुकावं लागलं.

6 / 7
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचान राजस्थान रॉयल्सविरुद्ध चांगला विक्रम आहे. आयपीएलचा पहिला किताब जिंकणाऱ्या राजस्थानविरुद्ध धोनीच्या यलो आर्मीने अनेक वेळा पराभूत केले आहे. दोन्ही संघ 15 वेळा भिडले आहेत आणि राजस्थानचा 10 वेळा पराभव झाला.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचान राजस्थान रॉयल्सविरुद्ध चांगला विक्रम आहे. आयपीएलचा पहिला किताब जिंकणाऱ्या राजस्थानविरुद्ध धोनीच्या यलो आर्मीने अनेक वेळा पराभूत केले आहे. दोन्ही संघ 15 वेळा भिडले आहेत आणि राजस्थानचा 10 वेळा पराभव झाला.

7 / 7
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली