AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : सरकार निर्णयाचे ‘असे’ हे स्वागत, जळगावात केळीच्या खोडाचे पूजन अन् जंगी मिरवणूक

जळगाव : जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, वातावरणातील बदलामुले केळी उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रतिकूल परस्थिती असताना राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. केळीला फळाचा दर्जा देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. याच निर्णयाचे स्वागत रावेलमध्ये वेगळ्या अंदाजात करण्यात आले आहे. येथील शेतकऱ्यांनी केळीच्या खोडाचे पूजन करुन केळीच्या पानाची शहरातून वाजत-गाजत जंगी मिरवणूक काढली आहे. सराकरच्या निर्णयाचे स्वागत केळी उत्पादकांनी वेगळ्या अंदाजात केले असून या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 11:25 AM
Share
लढ्याला यश : जळगाव जिल्ह्यातील केळीची उत्पादकता आणि वाढते क्षेत्र पाहता केळीला पिकाचा दर्जा मिळावा यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे अस्मानी संकटात केळीच्या नुकसानाची भरपाई देखील अल्प प्रमाणात मिळत होती त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून केळीला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी प्रलंबित होती.

लढ्याला यश : जळगाव जिल्ह्यातील केळीची उत्पादकता आणि वाढते क्षेत्र पाहता केळीला पिकाचा दर्जा मिळावा यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे अस्मानी संकटात केळीच्या नुकसानाची भरपाई देखील अल्प प्रमाणात मिळत होती त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून केळीला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी प्रलंबित होती.

1 / 4
केळी उत्पादनात होणार वाढ : निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी बागाचे मोठे नुकसान होत होते. शिवाय अनुदान शासकीय मदतहीन मिळत नव्हती. आता मात्र, केळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना योजनांचा तर लाभ होणारच आहे. पण उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचेच प्रयत्न राहणार असल्याने येथील उत्पादकांना अच्छे दिन येतील असा विश्वास शेतकऱ्यांनी  व्यक्त केला आहे.

केळी उत्पादनात होणार वाढ : निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी बागाचे मोठे नुकसान होत होते. शिवाय अनुदान शासकीय मदतहीन मिळत नव्हती. आता मात्र, केळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना योजनांचा तर लाभ होणारच आहे. पण उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचेच प्रयत्न राहणार असल्याने येथील उत्पादकांना अच्छे दिन येतील असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

2 / 4
रोजगार हमी योजनेत सहभाग:अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ आता केळी उत्पादकांना घेता येणार आहे.

रोजगार हमी योजनेत सहभाग:अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ आता केळी उत्पादकांना घेता येणार आहे.

3 / 4
केळी खोडाचे पूजन अन् शहरभर मिरवणूक : अर्थसंकल्पात केळीचा फळामध्ये समावेश करण्याचा निर्णय होताच शेतकरी, व्यापारी यांनी रावेल शहरात केळीच्या खोडाचे पूजन केले तर केळीची पाने घेऊन शहरभर ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवूक काढली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केळी खोडाचे पूजन अन् शहरभर मिरवणूक : अर्थसंकल्पात केळीचा फळामध्ये समावेश करण्याचा निर्णय होताच शेतकरी, व्यापारी यांनी रावेल शहरात केळीच्या खोडाचे पूजन केले तर केळीची पाने घेऊन शहरभर ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवूक काढली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4 / 4
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.