AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून सुरुवात; शहाजी बापू पाटील आणखी काय म्हणाले?

ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा प्रचंड राग एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे,.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, 'या' जिल्ह्यातून सुरुवात; शहाजी बापू पाटील आणखी काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2022 | 5:40 PM
Share

सोलापूर: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या (thackeray camp) संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. शिरसाट यांनी आपण कुणाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही शिरसाट यांच्या फुटीच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे (ncp) दोन आकडी नेते फुटणार आहे. ही फुटीची सुरुवात सोलापुरातून होणार आहे, असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात यासाठी बोललं जातंय कारण राष्ट्रवादीतील 12 नेते फुटलेले आहेत. पण ज्याचा त्याचा मुहूर्त ठरायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यातील मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीला दणका बसणार आहे. सोलापुरातील हा नेता फुटणार आहे. जरा थांबा. ठरवून सगळं शिजवून झालेलं आहे. फक्त झाकण उघडायचे आणि वाढायचे आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

तुम्ही काळाजी करू नका. नेत्याच्या हातात आता काही राहिलं नाही. सगळं पोरांनी केलंय. प्रत्येक गोष्ट राज्यात इथून पुढे ओकेचं होणार आहे. 170 आमदार शिंदे फडणवीस यांच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे कुणीही चिंता करायची गरज नाही, असंही ते म्हणाले.

आमच्या आमदारांना निधी मिळताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच नेते खूष आहेत. आमचं सरकार मजबूत असून कामही चांगलं सुरू आहे. आमच्या सरकारची कुणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा प्रचंड राग एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.