AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून सुरुवात; शहाजी बापू पाटील आणखी काय म्हणाले?

ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा प्रचंड राग एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे,.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, 'या' जिल्ह्यातून सुरुवात; शहाजी बापू पाटील आणखी काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2022 | 5:40 PM
Share

सोलापूर: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या (thackeray camp) संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. शिरसाट यांनी आपण कुणाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही शिरसाट यांच्या फुटीच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे (ncp) दोन आकडी नेते फुटणार आहे. ही फुटीची सुरुवात सोलापुरातून होणार आहे, असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात यासाठी बोललं जातंय कारण राष्ट्रवादीतील 12 नेते फुटलेले आहेत. पण ज्याचा त्याचा मुहूर्त ठरायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यातील मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीला दणका बसणार आहे. सोलापुरातील हा नेता फुटणार आहे. जरा थांबा. ठरवून सगळं शिजवून झालेलं आहे. फक्त झाकण उघडायचे आणि वाढायचे आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

तुम्ही काळाजी करू नका. नेत्याच्या हातात आता काही राहिलं नाही. सगळं पोरांनी केलंय. प्रत्येक गोष्ट राज्यात इथून पुढे ओकेचं होणार आहे. 170 आमदार शिंदे फडणवीस यांच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे कुणीही चिंता करायची गरज नाही, असंही ते म्हणाले.

आमच्या आमदारांना निधी मिळताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच नेते खूष आहेत. आमचं सरकार मजबूत असून कामही चांगलं सुरू आहे. आमच्या सरकारची कुणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा प्रचंड राग एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे, असंही त्यांनी सांगितलं.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.