AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : हे चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार, कितीही पिपाण्या वाजवा अंतर्गत कलहानेच पडेल, राऊतांचा दावा

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. काल आदित्य ठाकरे वैजापूर, पैठणला होते. त्यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Sanjay Raut : हे चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार, कितीही पिपाण्या वाजवा अंतर्गत कलहानेच पडेल, राऊतांचा दावा
हे चोऱ्यामाऱ्या करून आलेलं सरकार, कितीही पिपाण्या वाजवा अंतर्गत कलहानेच पडेल, राऊतांचा दावाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 24, 2022 | 10:50 AM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत  (sanjay raut) यांनी राज्याती शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला केला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे चोऱ्यामाऱ्या करून आलं आहे. त्यांचा पाया मजबूत नाही. हे सरकार लवकर पडेल. अंतर्गत कलहानेच पडेल. आम्ही तारखा देत बसणार नाही. त्यांना कितीही पिपाण्या वाजवू द्या. अगदी सनई चौघडेही वाजवू द्या. पण हे सरकार जाणार म्हणजे जाणार, असं सांगतानाच शिवसैनिकांच्या (shivsena) अश्रूच्या महापुरात हे सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, असा दावाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावरही जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर कितीही कारवाई केली तरी त्यांचे सर्व कारनामे मला माहीत आहेत, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाथसागरच जणू रस्त्यावर उतरला

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. काल आदित्य ठाकरे वैजापूर, पैठणला होते. त्यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. माणसांच्या तरुणांच्या रुपात नाथसागरच जणू रस्त्यावर उतरल्याचं चित्रं होतं. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. पण हे चित्रं आगामी काळातही दिसेल, असं राऊत यांनी सांगितलं.

आम्ही तारखा देणार नाही, पण

ज्यांनी चोऱ्यामाऱ्या करून सरकार स्थापन केलं, भाजप असेल अन्य कुणी असेल, त्यांच्या छातीत धडकी भरवणारे आहे हे चित्रं होतं. अनेक जुन्या शिवसैनिकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या अश्रूच्या महापुरातच डबल स्टँडर्ड सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. ही भावना लोकांच्या मनात आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही हे सरकार जाणार असल्याचं वारंवार सांगत आहेत. पण आम्ही भाजपसारखं बोलणार नाही. आम्ही तारखा देणार नाही. 11 दिवसात सरकार पडेल, 15 दिवसात सरकार पडेल, अशा तारखा आम्ही लाऊडस्पीकरवरून त्यांच्या सारख्या देणार नाही. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. पण हे सरकार टिकत नाही. हे सरकार राहत नाही. हे सरकार बहुमत गमावेल. हे सरकार अंतर कलहाने पडेल. हे सरकार मजबूत पायावर कधीच उभं नव्हतं आणि नाही आणि राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

शिवसेनेचा लाऊडस्पीकर घुमतच राहील

आता कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. कुणाला काय पिपाण्या वाजवायच्या त्या वाजवू द्या. सनई चौघडे वाजवायचे ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा बुलंद आवाज आहे. तसाच तो घुमत राहील. भोंगे आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे. त्यांचे भोंगे भाडोत्री आहेत. शिवसेनचा लाऊडस्पीकर 56 वर्ष सुरू आहे. हा लाऊडस्पीकरवरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी 56 वर्ष महाराष्ट्र आणि देश शिवसेनेच्या मागे उभा आहे. तो तसाच राहील, असंही ते म्हणाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.