AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवेंद्रराजेच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार : नवाब मलिक

अल्पसंख्याक मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केलाय.

शिवेंद्रराजेच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार : नवाब मलिक
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 25, 2021 | 6:54 PM
Share

परभणी : अल्पसंख्याक मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केलाय. नवाब मलिक यांना शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी विचारलं असता त्यांनी शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केलाय. तसेच लवकरच या इच्छुकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत अनेकांची घरवापसी होणार असल्याचं दिसतंय (Nawab Malik claim many ex NCP leader will return in party soon).

भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी (24 जानेवारी) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरातील शिवेंद्रराजेंनी अजित पवार यांची घेतलेली ही तिसरी भेट आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यांच्या राष्ट्रवादी वापसीच्याही चर्चा रंगू लागल्यात. त्यातच नवाब मलिक यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील शेतकरी आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सरकार कायदे करू शकते आणि रद्दही करू शकते. पण लोकशाहीमध्ये हिताचे कायदे केले पाहिजेत. यासाठी डाव्या विचारसरणीचे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. केंद्र सरकारने राज्य मॉडेल अॅक्ट तयार केले असते, तर तो लागू करायचे की नाही हा राज्य सरकारचा अधिकार असतो. पण केंद्र सरकारने हे कायदे राज्यांवर लादण्याचं काम केलंय.”

“आता दीड वर्ष हे कायदे स्थगित करू असं सरकार म्हणतंय. यात केंद्र सरकारला नवीन कायदे करायचे असतील तर त्यामध्ये शेतकऱ्यांना विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे. पण आम्ही जे करू तेच स्वीकारले पाहिजे ही मोदींची भूमिका योग्य नाहीये. आम्ही या विरोधात आहोत,” अस नवाब मलिक यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

नवाब मलिकांच्या ताफ्यासमोर मानसेवी शिक्षकांची घोषणाबाजी, पोलिसांची तारांबळ

भाजपचे दावे खोटे, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ : नवाब मलिक

एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिक म्हणाले….

व्हिडीओ पाहा :

Nawab Malik claim many ex NCP leader will return in party soon

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...