AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या 'दगाबाजी'मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?
नितीश कुमारImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 28, 2024 | 12:50 PM
Share

पाटना : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. यावरून इंडिया आघाडी (India Alliance) मोठा सुरूंग लागला आहे. ही युती ज्या उत्साहाने सुरु झाली होती त्याच गतीने तुटत असल्याचे चित्र आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या ‘दगाबाजी’मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये इतका रोष आहे की, त्यांनी नितीश यांची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असेही ते म्हणाले. आहा प्रश्न हा पडलाय की आघाडीचे पुढे काय होणार?

आघाडीचं पुढे काय?

भाजपाची शक्ती कमकुवत करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठका झाल्या. एनडीएच्या विरोधात पर्यायाची घोषणा करण्यात आली. वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला, मात्र ठोस परिणाम निघाला नसल्याचे चित्र आहे. या सळ्यांमध्ये काँग्रेस मोठा भाऊ म्हणून भूमिका पार पाडत होती. मात्र आता या आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधून ममतांचा एकला चलोचा नारा, दिल्ली आणि पंजाबमधील सामान्य माणसाची वृत्ती आणि या आघाडीचे मुख्य नियोजक नितीशकुमार, एनडीएमध्ये सामील होणे तसेच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला आपली नेमकी स्थिती सांगणे यामुळे या आघाडीला सुरूंग लागला आहे.

सध्याची परिस्थिती पाहाता ही युती आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याआधीच तुटत असल्याचं दिसत आहे. यामागचे मूळ कारण असे होते की, ज्या राज्यांत आपला जनमानस गमावला होता, त्या राज्यांतील स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करून काँग्रेसला आपली ताकद वाढवायची होती. लोकसभा निवडणूकींआधी जागा वाटपांवरून मतभेद होण्याची शक्यता असल्याचे भाकित राजकिय विश्लेषकांकडून अनेकदा वर्तवण्यात आले. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे इतर पक्षांच्या भूमिकेत बदल होणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...