AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या 'दगाबाजी'मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?
नितीश कुमारImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 28, 2024 | 12:50 PM
Share

पाटना : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. यावरून इंडिया आघाडी (India Alliance) मोठा सुरूंग लागला आहे. ही युती ज्या उत्साहाने सुरु झाली होती त्याच गतीने तुटत असल्याचे चित्र आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या ‘दगाबाजी’मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये इतका रोष आहे की, त्यांनी नितीश यांची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असेही ते म्हणाले. आहा प्रश्न हा पडलाय की आघाडीचे पुढे काय होणार?

आघाडीचं पुढे काय?

भाजपाची शक्ती कमकुवत करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठका झाल्या. एनडीएच्या विरोधात पर्यायाची घोषणा करण्यात आली. वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला, मात्र ठोस परिणाम निघाला नसल्याचे चित्र आहे. या सळ्यांमध्ये काँग्रेस मोठा भाऊ म्हणून भूमिका पार पाडत होती. मात्र आता या आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधून ममतांचा एकला चलोचा नारा, दिल्ली आणि पंजाबमधील सामान्य माणसाची वृत्ती आणि या आघाडीचे मुख्य नियोजक नितीशकुमार, एनडीएमध्ये सामील होणे तसेच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला आपली नेमकी स्थिती सांगणे यामुळे या आघाडीला सुरूंग लागला आहे.

सध्याची परिस्थिती पाहाता ही युती आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याआधीच तुटत असल्याचं दिसत आहे. यामागचे मूळ कारण असे होते की, ज्या राज्यांत आपला जनमानस गमावला होता, त्या राज्यांतील स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करून काँग्रेसला आपली ताकद वाढवायची होती. लोकसभा निवडणूकींआधी जागा वाटपांवरून मतभेद होण्याची शक्यता असल्याचे भाकित राजकिय विश्लेषकांकडून अनेकदा वर्तवण्यात आले. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे इतर पक्षांच्या भूमिकेत बदल होणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण