AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या 'दगाबाजी'मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?
नितीश कुमारImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 28, 2024 | 12:50 PM
Share

पाटना : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. यावरून इंडिया आघाडी (India Alliance) मोठा सुरूंग लागला आहे. ही युती ज्या उत्साहाने सुरु झाली होती त्याच गतीने तुटत असल्याचे चित्र आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या ‘दगाबाजी’मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये इतका रोष आहे की, त्यांनी नितीश यांची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असेही ते म्हणाले. आहा प्रश्न हा पडलाय की आघाडीचे पुढे काय होणार?

आघाडीचं पुढे काय?

भाजपाची शक्ती कमकुवत करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठका झाल्या. एनडीएच्या विरोधात पर्यायाची घोषणा करण्यात आली. वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला, मात्र ठोस परिणाम निघाला नसल्याचे चित्र आहे. या सळ्यांमध्ये काँग्रेस मोठा भाऊ म्हणून भूमिका पार पाडत होती. मात्र आता या आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधून ममतांचा एकला चलोचा नारा, दिल्ली आणि पंजाबमधील सामान्य माणसाची वृत्ती आणि या आघाडीचे मुख्य नियोजक नितीशकुमार, एनडीएमध्ये सामील होणे तसेच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला आपली नेमकी स्थिती सांगणे यामुळे या आघाडीला सुरूंग लागला आहे.

सध्याची परिस्थिती पाहाता ही युती आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याआधीच तुटत असल्याचं दिसत आहे. यामागचे मूळ कारण असे होते की, ज्या राज्यांत आपला जनमानस गमावला होता, त्या राज्यांतील स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करून काँग्रेसला आपली ताकद वाढवायची होती. लोकसभा निवडणूकींआधी जागा वाटपांवरून मतभेद होण्याची शक्यता असल्याचे भाकित राजकिय विश्लेषकांकडून अनेकदा वर्तवण्यात आले. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे इतर पक्षांच्या भूमिकेत बदल होणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.