AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशांत किशोर यांनी पुन्हा विरोधकांना डिवचले, म्हणाले 4 जून रोजी भरपूर पाणी…

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीमध्ये भाजपच पुन्हा विजयी होईल असा दावा केला. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे. मात्र, त्याला प्रशांत किशोर यांनी एक ट्विट करून उत्तर दिले आहे.

प्रशांत किशोर यांनी पुन्हा विरोधकांना डिवचले, म्हणाले 4 जून रोजी भरपूर पाणी...
pm modi and rahul gandhiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: May 23, 2024 | 9:45 PM
Share

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीमध्ये भाजपला 2024 च्या निवडणुकीतही विजय मिळेल असा दावा केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जितक्या जागा जिंकल्या होत्या तितक्याच जागा यावेळच्या निवडणुकीत भाजप जिंकेल असा दावा त्यांनी केला होता. तसेच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास त्यांचा प्राधान्यक्रम काय असेल याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. प्रशांत किशोर यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली आहे. त्यावर प्रशांत किशोर यांनी एक ट्विट करून विरोधकांना डिवचले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचार सुरु आहे. 2 जून रोजी सातवा टप्पा पूर्ण होईल आणि 4 जून रोजी निकाल जाहीर होईल. प्रशांत किशोर यांनी भाजप पुन्हा विजयी मिळेल असा दावा केला आहे. विरोधकांनी त्यावरून प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली आहे. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी विरोधकांना 4 जून रोजी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे. ‘पाणी पिणे चांगले आहे. कारण ते मन आणि शरीर दोन्ही हायड्रेट ठेवते. या निवडणुकीच्या निकालाचे माझे मूल्यांकन पाहून ज्यांना आश्चर्य वाटते त्यांनी 4 जून रोजी भरपूर पाणी हातात ठेवावे. 2021 मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यापूर्वी केलेले भाकीत लक्षात ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी बंगालमध्ये भाजप तिहेरी आकडा गाठणार नाही असा दावा केला होता. तर, अनेक वाहिन्यांनी भाजपच्या विजयाचे भाकीत केले होते. मात्र, प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला होता. तर, नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी “मला वाटते मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप पुनरागमन करत आहे. गेल्या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या असतील तितक्याच जागा मिळू शकतात किंवा त्यांची कामगिरी पूर्वीपेक्षा थोडी चांगली असू शकते. भाजप सरकारच्या विरोधात लोक निराश किंवा संतप्त असले तरी मोदी सरकार हटवल्याबद्दल फारसा राग नाही असे म्हटले होते.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?