AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तालिबान्यांचं उत्पन्न गांज्यातून, आता शेतकरीही तिच मागणी करतोय, दखल घ्या अन्य़था महागात पडेल : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या मालाला मिळणाऱ्या दरावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच शेतकऱ्यांसोबत असंच वागत राहिला तर देश तालिबानच्या दिशेने जाईल, असा इशारा दिला.

तालिबान्यांचं उत्पन्न गांज्यातून, आता शेतकरीही तिच मागणी करतोय, दखल घ्या अन्य़था महागात पडेल : राजू शेट्टी
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 7:57 PM
Share

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या मालाला मिळणाऱ्या दरावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच शेतकऱ्यांसोबत असंच वागत राहिला तर देश तालिबानच्या दिशेने जाईल, असा इशारा दिला. तालिबान्यांचं उत्पन्न गांज्यातून आहे आणि आता शेतकऱ्यावरही गांजा उत्पादन करण्याची परवानगी मागण्याची वेळ आलीय. त्यामुळे लवकर शेतकऱ्यांची दखल घ्या, अन्यथा महागात पडेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. त्यांनी उसाचे दर निश्चित करणाऱ्या कृषी मूल्य आयोगालाही आव्हान दिलं.

“800 रुपयात 1 टन ऊस कुठं पिकतो हे कृषी मूल्य आयोगानं दाखवून द्यावं”

राजू शेट्टी म्हणाले, “कृषी मूल्य आयोग केंद्र सरकारच्या हातचं बाहुलं झालंय. या आयोगाने उसाचा क्विंटलला उत्पन्न खर्च 155 रुपये म्हणजेच टनाला 1550 रुपये दाखवला. या रकमेच्या 87 टक्के म्हणजेच 2900 रुपये एफआरपी दिल्याचं सांगत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या 1550 रुपयांमध्ये 750 रुपये तोडणी आणि वाहतुकीचा खर्च आहे. तो वजा केल्यास फक्त 800 रुपये शिल्लक राहतात. 800 रुपयात 1 टन (1000 हजार किलो) ऊस कुठं पिकतो हे कृषी मूल्य आयोगानं दाखवून द्यावं.”

“शेतकऱ्याला असंच वागवायला लागला तर हा देश सुद्धा तालिबान्यांच्याच दिशेने जाईल”

“मी माझ्या कुटुंबाची 10 एकर जमीन कृषी मूल्य आयोगाला द्यायला तयार आहे. त्यांनी देशातील सर्वोत्कृष्ट कृषी तज्ज्ञ आणावेत आणि 800 रुपयात 1 टन ऊस पिकवून दाखवावा. कशाला थापा मारत आहेत? अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करायला लागला आहात म्हणून आज शेतकरी गांजा पिकवण्याची परवानगी देण्याची मागणी करायला लागले आहेत. ही गमतीची गोष्ट नाही. आज सगळ्या जगाला त्रासदायक ठरलेल्या तालिबान्यांचं उत्पन्नाचं स्त्रोत गांजा आणि अफिम आहे हे विसरू नका. तुम्ही जर शेतकऱ्याला असंच वागवायला लागला तर हा देश सुद्धा तालिबान्यांच्याच दिशेने जाईल याची जाणीव ठेवा,” असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

कृषिमूल्य आयोग एफआरपी सरकारच्या सोयीनुसार ठरवतं की उत्पादन खर्च पाहून? : राजू शेट्टी

पायातलं हाता घ्या, राजू शेट्टींची 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक

एफआरपीचे तुकडे केल्यास कुणासोबतही दोन हात करायची तयारी, राजू शेट्टींचा महाविकासआघाडीला इशारा

व्हिडीओ पाहा :

Raju Shetti warn government about Farmer condition and Taliban

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.