तालिबान्यांचं उत्पन्न गांज्यातून, आता शेतकरीही तिच मागणी करतोय, दखल घ्या अन्य़था महागात पडेल : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या मालाला मिळणाऱ्या दरावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच शेतकऱ्यांसोबत असंच वागत राहिला तर देश तालिबानच्या दिशेने जाईल, असा इशारा दिला.

तालिबान्यांचं उत्पन्न गांज्यातून, आता शेतकरीही तिच मागणी करतोय, दखल घ्या अन्य़था महागात पडेल : राजू शेट्टी
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 7:57 PM

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या मालाला मिळणाऱ्या दरावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच शेतकऱ्यांसोबत असंच वागत राहिला तर देश तालिबानच्या दिशेने जाईल, असा इशारा दिला. तालिबान्यांचं उत्पन्न गांज्यातून आहे आणि आता शेतकऱ्यावरही गांजा उत्पादन करण्याची परवानगी मागण्याची वेळ आलीय. त्यामुळे लवकर शेतकऱ्यांची दखल घ्या, अन्यथा महागात पडेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. त्यांनी उसाचे दर निश्चित करणाऱ्या कृषी मूल्य आयोगालाही आव्हान दिलं.

“800 रुपयात 1 टन ऊस कुठं पिकतो हे कृषी मूल्य आयोगानं दाखवून द्यावं”

राजू शेट्टी म्हणाले, “कृषी मूल्य आयोग केंद्र सरकारच्या हातचं बाहुलं झालंय. या आयोगाने उसाचा क्विंटलला उत्पन्न खर्च 155 रुपये म्हणजेच टनाला 1550 रुपये दाखवला. या रकमेच्या 87 टक्के म्हणजेच 2900 रुपये एफआरपी दिल्याचं सांगत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या 1550 रुपयांमध्ये 750 रुपये तोडणी आणि वाहतुकीचा खर्च आहे. तो वजा केल्यास फक्त 800 रुपये शिल्लक राहतात. 800 रुपयात 1 टन (1000 हजार किलो) ऊस कुठं पिकतो हे कृषी मूल्य आयोगानं दाखवून द्यावं.”

“शेतकऱ्याला असंच वागवायला लागला तर हा देश सुद्धा तालिबान्यांच्याच दिशेने जाईल”

“मी माझ्या कुटुंबाची 10 एकर जमीन कृषी मूल्य आयोगाला द्यायला तयार आहे. त्यांनी देशातील सर्वोत्कृष्ट कृषी तज्ज्ञ आणावेत आणि 800 रुपयात 1 टन ऊस पिकवून दाखवावा. कशाला थापा मारत आहेत? अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करायला लागला आहात म्हणून आज शेतकरी गांजा पिकवण्याची परवानगी देण्याची मागणी करायला लागले आहेत. ही गमतीची गोष्ट नाही. आज सगळ्या जगाला त्रासदायक ठरलेल्या तालिबान्यांचं उत्पन्नाचं स्त्रोत गांजा आणि अफिम आहे हे विसरू नका. तुम्ही जर शेतकऱ्याला असंच वागवायला लागला तर हा देश सुद्धा तालिबान्यांच्याच दिशेने जाईल याची जाणीव ठेवा,” असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

कृषिमूल्य आयोग एफआरपी सरकारच्या सोयीनुसार ठरवतं की उत्पादन खर्च पाहून? : राजू शेट्टी

पायातलं हाता घ्या, राजू शेट्टींची 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक

एफआरपीचे तुकडे केल्यास कुणासोबतही दोन हात करायची तयारी, राजू शेट्टींचा महाविकासआघाडीला इशारा

व्हिडीओ पाहा :

Raju Shetti warn government about Farmer condition and Taliban

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.