AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा; बैठक लांबणार?

शरद पवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा झाली नाही. पावसामुळे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका स्थगित करण्यात आल्या आहेत.

शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा; बैठक लांबणार?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2023 | 9:22 AM
Share

मुंबई | 29 जुलै 2023 : पाटणा आणि बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, ही बैठक लांबण्याची शक्यता आहे. काँग्रेसने ही बैठक सप्टेंबरमध्ये घेण्याची विनंती केली आहे, त्यामुळे ही बैठक कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीची चर्चा करण्यासाठी काँग्रेसचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटलं. यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकीवर चर्चा करण्यात आली. ही बैठक सुरू असतानाच शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बैठकीबाबत चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. विरोधी पक्षातील जवळपास 100 नेते या बैठकीला येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. बंगळुरूच्या बैठकीला 26 पक्षांचे नेते होते. मुंबईतील बैठकीतील हा आकडा वाढू शकतो, असंही सांगितलं जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. ही बैठक 15 ऑगस्टनंतर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ही बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही बैठक घेण्याची आम्ही विनंती केली आहे. मात्र, अजून तारीख निश्चित झालेली नाही, असं नाना पटोले म्हणाले.

मुंबईतील बैठकीचं विशेष महत्त्व

मुंबईत होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे. इंडिया आघाडीची पहिल्यांदाच मुंबईत बैठक होत आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यात विरोधकांची सत्ता नाही, त्या राज्यात होणारी ही पहिली बैठक आहे. या आधी बिहारच्या पाटण्यात ही बैठक झाली होती. तिथे नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची सत्ता आहे. दोघेही नेते इंडिया आघाडीत आहे.

दुसरी बैठक कर्नाटकाच्या बंगळुरूमध्ये झाली. तिथे काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे सत्ता नसलेल्या राज्यात इंडिया आघाडीची पहिल्यांदाच बैठक होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीने या बैठकीचं आयोजन केलं आहे.

उद्धव ठाकरेंना फोन

शुक्रवारी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. ही बैठक सुरू असताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावला. त्यांच्याशी इंडिया आघाडीच्या बैठकीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आधीच्या दोन बैठकांचा अनुभव सांगून बैठकीच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केलं. मुंबईतील विरोधकांच्या बैठकीला 100 नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तिकीट वाटपाची चर्चा नाही

दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा झाली नाही. पावसामुळे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका स्थगित करण्यात आल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर या बैठका पुन्हा सुरू होतील. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या राज्यभरात संयुक्त सभा होणार आहेत. या बैठकीत तिकीट वाटपाची चर्चा झाली नाही.

आम्ही आधीच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चार पाच बैठका घेतल्या होत्या. आता तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करू. यावेळी जागा वाटप आणि उमेदवारांची निवड यावर चर्चा होईल, असं नाना पटोले म्हणाले.

Follow Us
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.