AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरात चुकूनही लावू नये ही झाडे, निर्माण होते प्रगतीत बाधा

वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घरात काही झाडे आणण्यासही सक्त मनाई आहे. वास्तुशास्त्रानुसार त्यांना घरी आणल्याने घरातील आशीर्वाद नष्ट होतात, तसेच  लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते.

Vastu Tips : घरात चुकूनही लावू नये ही झाडे, निर्माण होते प्रगतीत बाधा
वास्तूशास्त्रानुसार ही झाडे घरात लावू नयेImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 04, 2023 | 11:19 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती अत्यंत पूजनीय मानल्या जातात. असे मानले जाते की ही झाडे घरात लावल्याने सुख-समृद्धी आणि लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होते. पण वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घरात काही झाडे आणण्यासही सक्त मनाई आहे. वास्तुशास्त्रानुसार त्यांना घरी आणल्याने घरातील आशीर्वाद नष्ट होतात, तसेच  लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रात कोणती झाडे अशुभ मानली जातात, जी प्रत्येकाने घरात लावणे टाळावे.

चुकूनही घरात आणू नका ही रोपे

  1. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत आणि आजूबाजूला काटेरी झाडे कधीही लावू नयेत. काटेरी झाडे घरात तणावाचे वातावरण निर्माण करतात. ही झाडे घरात लावल्याने घरातील सदस्यांमधील मतभेद वाढतात.
  2. घरात लावलेले कोणतेही रोप सुकत असेल तर ते लगेच काढून टाकावे. वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडे आणि रोपे सुकली की नकारात्मक ऊर्जा वाढते.
  3. पिंपळाच्या झाडाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असले तरी ते घरात लावणे शुभ नाही. या झाडामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. असे मानले जाते की या झाडावर नकारात्मक घटक राहतात. त्यामुळे ते घरात लावू नये. घराच्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात पिंपळाचे रोप उगवले असेल तर तेही काढून टाकावे.
  4. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये चिंचेचे झाड लावणे देखील खूप अशुभ आहे. हे झाड लावल्याने घरात नकारात्मकता येते. हे लावल्याने घरात नेहमी भीतीचे वातावरण असते. त्यामुळे चिंचेचे झाड घरात कधीही लावू नये.
  5.  वास्तुशास्त्रानुसार घरात कडुलिंबाचे झाडही लावू नये. त्यात कटुता आहे. असे मानले जाते की हे घरामध्ये लावल्याने घरामध्ये नकारात्मकता निर्माण होऊ लागते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.