AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्याच्या यांनी आपण आपले आयुष्य कसे जगायचे यांचे धडे दिले. आयुष्यात येणाऱ्या कठीण गोष्टींना आपण कसे सामोरे जावू शकतो याचे उत्तम शिक्षण आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे.

Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी लक्षात ठेवा
chanakya-niti
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्याच्या यांनी आपण आपले आयुष्य कसे जगायचे यांचे धडे दिले. आयुष्यात येणाऱ्या कठीण गोष्टींना आपण कसे सामोरे जावू शकतो याचे उत्तम शिक्षण आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. आयुष्यात प्रत्येकाकडून खूप चुका होतात. परंतु आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे कारण आपल्याला भविष्यात तिच चुक आपल्या कडून होणार नाही. पण आपल्या पैकी अनेक जण एकच चुक अनेक वेळा करतात. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण जर तुम्हाला आयुष्यातील समस्या दूर करायच्या असतील तर आचार्य चाणक्या यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कधीही विसरू नका. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

या 4 गोष्टी लक्षात ठेवा

1. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने आपले काम व्यवस्थित मन लावून केले पाहीजे, जे लोक ही गोष्ट करत नाहीत ते आयुष्यात नेहमी अडखळतात. या व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी समस्या असतात. चाणक्यांच्या मते आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सावधानगिरी बाळगली पाहिजे.

2.आचार्य चाणक्यांच्या मते आपण स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे असते. देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छ ठिकाणी राहते. जर तुम्ही आयुष्यात स्वच्छता राखलीत तर तुमच्याकडे पैशाची चणचण कधीही भासणार नाही.

3. आचार्य म्हणायचे की कोणतेही काम पूर्ण मनाने करा , त्या कामासाठी विचार करा त्यानंतरच निर्णय घ्या. जेणेकरून त्या निर्णयाच्या प्रत्येक परिणामासाठी तुम्ही स्वतःला तयार करू शकता आणि फसवणूक होणार नाही.

४. आचार्यांचा असा विश्वास होता की माणसाने नेहमी सत्याचाच आधार घेतला पाहिजे. खोटे बोलणारा माणूस स्वतःच्याच खोटेपणात अडकतो. एक खोटे लपवण्यासाठी त्याला अनेक खोटे बोलावे लागतात. अशा परिस्थितीत तो एक ना एक दिवस असा व्यक्ती नक्कीच अडचणीत येतो.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

संबंधित बातम्या

05 December 2021 Panchang : कसा असेल रविवारचा दिवस, ​​शुभ अशुभ मुहूर्त, पाहा काय सांगतेय पंचांग

Chandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल

Stranger Things | ऐकावे ते नवलच, इथे देवाला वाहिले जातात चक्क दगड, जाणून घ्या महाराष्ट्राच्या कुठल्या गावात आहे ही परंपरा

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.