AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, पुढली टक्कर कधी ? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही..

IND vs PAK, Next Match: भारत आणि पाकिस्तानमधील कालच्या हाय व्होल्टेज लढतीनंतर आता हे दोन्ही संघ पुन्हा कधी भिडणार, त्यांचा पुढील सामना कधी होणार?असा सवाल सर्वांच्या मनात आहे. चला जाणून घेऊया नक्की काय होऊ शकतं..

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, पुढली टक्कर कधी ? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही..
भारत वि. पाकिस्तान
| Updated on: Sep 22, 2025 | 1:30 PM
Share

India vs Pakistan : आशिया कप 2025 स्पर्धेला सुरूवात झाल्यापासूनच ती प्रचंड चर्चेत असून स्पर्धेतील रोमांच थांबण्याचा नावचं घेत नाही. भारत-पाकिस्तानमधील महिल्या सामन्यापासूनच सॉलिड ड्रामा दिसत असून कालच्या सामन्यात तर बरीच तूतू-मैमै झालेली दिसली. पाकच्या खेळाडूंचं विचित्र वागणं, त्यातच झालेला पराभव त्यांना झोंबला, त्यामुळे त्यांचं वागणं खूप चर्चेत होतं. 9 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या आशिया कपमध्ये भीरत-पाक आत्तापर्यंत 2 वेळा आमने -सामने आले असून दोन्ही वेळा भारतीय संघाने त्यांना धूळ चारली. आणि भविष्यातही, याच स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये पुन्हा टक्कर होऊ शकते.

पण प्रश्न असा आहे की, भारत-पाकिस्तानचा पुढचा सामना कधी होईल? जर स्पर्धेच्या स्वरूपानुसार हे दोन्ही संघ आता अंतिम फेरीत समोर येणार असतील, तर तिथे पोहोचेपर्यंतचा त्यांचा रस्ता कसा असेल ?

सुपर-4 स्टेजवर आता काय परिस्थिती ?

भारत आणि पाकिस्तान दोघेही सध्या आशिया कप 2025 च्या सुपर-4फेरीत खेळत आहेत. सुपर-4 च्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर असं दिसेल की, या टप्प्यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभूत केल्यामुळे, भारत सध्या या गुणतालिकेत आघाडीवर आहे. भारतीय संघाचे सध्या 2 पॉईंट्स आहेत आणि 0.689 हा रनरेट आहे. तर भारताकडून दारूण पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान सुपर फोर पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. त्यांचा रनरेट सुद्धामायनस (-0.689) आहे. दरम्यान सुपर 4 फेरीत प्रत्येकी 1-1 सामना खेळल्यानंतर बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा रन रेट देखील प्लस झोनमध्ये आहे, तर श्रीलंकेचा रन रेट मायनस झोनमध्ये आहे.

भारत-पाकिस्तान पुन्हा लढत कधी ?

आत असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे तो म्हणजे, आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पुन्हा एकमेकांसमोर यायचं असेल तर भारत-पाकिस्तानचा संघ कसा पुढे जाईल. तसं झालं तर या स्पर्धेत दोन्ही संघ तिसऱ्यांदा एकमेकांशी भिडतील, त्यांच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी पर्वणी असेल. याचं समीकरण नीट समजून घेऊया.

भारत आणि पाकिस्तानला आता सुपर-4 मध्ये आणखी 2-2 सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ सध्या विजयरथावर स्वार आहे, आणि ते जर असाचा विजय मिळवत राहिले तर हा संघ अंतिम फेरीत पोहोचणे निश्चित आहे. दरम्यान, सुपर फोरमध्ये भारताकडून पराभव पत्करल्यानंतर, पाकिस्तानला आता त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. 23 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि 25 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्धचे सामने पाकिस्तानला जिंकावे लागतील.

जर पाकिस्तानने हे दोन्ही सामने जिंकले आणि भारताने 24 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि 26 सप्टेंबर रोजी श्रीलंकेला हरवले, तर त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील की नाही हे ठरू शकेल. एकंदरीत, बांगलादेशविरुद्धचा सामना भारत आणि पाकिस्तान दोघांसाठीही महत्त्वाचा असेल, कारण बांगलादेशने सुपर 4 फेरीत आपला पहिला सामना आधीच जिंकला आहे.

Follow Us
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले