AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1983 World Cup : एक झेल, ज्याने सामना पलटला आणि भारताने इतिहास रचला, भारताच्या विश्वविजयाची कहाणी

भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस म्हणजे 25 जून 1983. याच दिवशी क्रिकेट जगतात काहीसा नवखा असणाऱ्या भारतीय संघाने सर्वांत बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करत विश्व चषकावर आपलं नाव कोरलं होत.

| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 12:48 PM
Share
सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वांत बलाढ्य संघामध्ये भारतीय संघाच नाव कायम असतं. कोणताही क्रिकेट प्रकार असलातरी भारत त्यात अव्वल असतो. पण इथवर पोहोचण्याचा भारतीय संघाचा प्रवास तितका सोपा नव्हता. पण जगात बेस्ट होण्याची सुरुवात भारताने आजच्याच दिवशी   बऱ्याच वर्षांआधी म्हणजे 25 जून 1983 केली होती. त्याकाळी सर्वांत ताकदवर असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला नमवत भारताने विश्वचषक जिंकला होता. (1983 world cup final India Won Against West Indies under Kapil Dev Captaincy )

सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वांत बलाढ्य संघामध्ये भारतीय संघाच नाव कायम असतं. कोणताही क्रिकेट प्रकार असलातरी भारत त्यात अव्वल असतो. पण इथवर पोहोचण्याचा भारतीय संघाचा प्रवास तितका सोपा नव्हता. पण जगात बेस्ट होण्याची सुरुवात भारताने आजच्याच दिवशी बऱ्याच वर्षांआधी म्हणजे 25 जून 1983 केली होती. त्याकाळी सर्वांत ताकदवर असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला नमवत भारताने विश्वचषक जिंकला होता. (1983 world cup final India Won Against West Indies under Kapil Dev Captaincy )

1 / 7
विश्वचषकाचा अंतिम सामन्यापर्यंत भारत पोहोचेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण कपिल देव (Kapil Dev) यांच्या कप्तानीखाली भारतीय संघानं हे करुन दाखवलं. पण अंतिम सामन्यात टक्कर होती दोनदा विश्वचषक जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाशी. वेस्ट इंडिज संघाने भारतीय फलंदाजावर भेदक गोलंदाजी करत त्यांना अवघ्या 183 धावांत ऑलआऊट केले.

विश्वचषकाचा अंतिम सामन्यापर्यंत भारत पोहोचेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण कपिल देव (Kapil Dev) यांच्या कप्तानीखाली भारतीय संघानं हे करुन दाखवलं. पण अंतिम सामन्यात टक्कर होती दोनदा विश्वचषक जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाशी. वेस्ट इंडिज संघाने भारतीय फलंदाजावर भेदक गोलंदाजी करत त्यांना अवघ्या 183 धावांत ऑलआऊट केले.

2 / 7
भारताकडून सर्वांत कमी वयाचा खेळाडू असणाऱ्या कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikanth) यांनी सर्वाधिक 38 धावा केल्या. तर अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांनी 26 धावांच योगदान दिलं होतं.

भारताकडून सर्वांत कमी वयाचा खेळाडू असणाऱ्या कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikanth) यांनी सर्वाधिक 38 धावा केल्या. तर अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांनी 26 धावांच योगदान दिलं होतं.

3 / 7
भारताने ठेवलेलं 183 धावांच लक्ष्य वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघासाठी अत्यंत कमी होते. मात्र भारताने अप्रतिम गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला अवघ्या 140 धावांत गुंडाळले. त्यात भारताकडून मदन लाल (Madan Lal) आणि मोहिंदर अमरनाथ (Mohindar Amarnath) यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले.

भारताने ठेवलेलं 183 धावांच लक्ष्य वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघासाठी अत्यंत कमी होते. मात्र भारताने अप्रतिम गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला अवघ्या 140 धावांत गुंडाळले. त्यात भारताकडून मदन लाल (Madan Lal) आणि मोहिंदर अमरनाथ (Mohindar Amarnath) यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले.

4 / 7
भारतीय गोलंदाजानी 140 धावांत वेस्ट इंडिजला ऑलआऊट केले खरे पण सामना बदलला तो एका कॅचने. वेस्ट इंडिजने 183 धावांच्या छोट्या लक्षाचा सामना करत असताना सर गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेंस यांचे विकेटगमावले होते. पण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक असणारे सर विवियन रिचर्ड्स (Sir vivian Richards) अजूनही क्रिझवर होते. तुफान फटकेबाजी करत असतानाच त्यांनी एक अप्रतिम शॉट हवेत मारला आणि त्याचवेळी क्षेत्ररक्षण करणारे कर्णधारकपिल देव यांनी बऱ्याच दूरचं अंतर गाठत हा अप्रतिम झेल पकडला आणि तिथूनच सामना भारताच्या पारड्यात झुकण्यास सुरुवात झाली.

भारतीय गोलंदाजानी 140 धावांत वेस्ट इंडिजला ऑलआऊट केले खरे पण सामना बदलला तो एका कॅचने. वेस्ट इंडिजने 183 धावांच्या छोट्या लक्षाचा सामना करत असताना सर गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेंस यांचे विकेटगमावले होते. पण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक असणारे सर विवियन रिचर्ड्स (Sir vivian Richards) अजूनही क्रिझवर होते. तुफान फटकेबाजी करत असतानाच त्यांनी एक अप्रतिम शॉट हवेत मारला आणि त्याचवेळी क्षेत्ररक्षण करणारे कर्णधारकपिल देव यांनी बऱ्याच दूरचं अंतर गाठत हा अप्रतिम झेल पकडला आणि तिथूनच सामना भारताच्या पारड्यात झुकण्यास सुरुवात झाली.

5 / 7
त्यानंतर भारताने एक एक करत विकेट घेण्यास सुरुवात केली. अखेर वेस्ट इंडिजकडून जॅफ डजन आणि मॅल्कम मार्शल यांनी थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा पण भारतीय गोलंदाजानी त्यांचीही विकेट घेत भारताला सामना जिंकवून दिला.

त्यानंतर भारताने एक एक करत विकेट घेण्यास सुरुवात केली. अखेर वेस्ट इंडिजकडून जॅफ डजन आणि मॅल्कम मार्शल यांनी थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा पण भारतीय गोलंदाजानी त्यांचीही विकेट घेत भारताला सामना जिंकवून दिला.

6 / 7
अशारितीने भारताने आपला पहिला विश्वचषक क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्डसवर मिळवला. ज्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत लॉर्डच्या बाल्कनीतील कपिल देव यांनी चषक घेतलेला फोटो अनेक भारतीय क्रिकेटपटूंना प्रेरणा देत आहे.

अशारितीने भारताने आपला पहिला विश्वचषक क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्डसवर मिळवला. ज्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत लॉर्डच्या बाल्कनीतील कपिल देव यांनी चषक घेतलेला फोटो अनेक भारतीय क्रिकेटपटूंना प्रेरणा देत आहे.

7 / 7
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.