AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : यशस्वी, साई आणि पंतची अर्धशतकं खेळी, भारताच्या पहिल्या डावात 358 धावा

England vs India 4th Test : टीम इंडियाने चौथ्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 358 धावा केल्या. भारताला 350 पोहचवण्यात साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत या तिघांनी सर्वाधिक योगदान दिलं.

ENG vs IND : यशस्वी, साई आणि पंतची अर्धशतकं खेळी, भारताच्या पहिल्या डावात 358 धावा
Rishahb Pant and Sai SudharsanImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 24, 2025 | 8:10 PM
Share

ओपनर यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि उपकर्णधार ऋषभ पंत या त्रिकुटाने केलेलं अर्धशतक आणि शार्दूल ठाकुर याच्या चिवट खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी सर्वबाद 358 धावा केल्या आहेत. भारताच्या शेवटच्या 3 फलंदाजांचा अपवाद वगळता इतर सर्वांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र एकालाही या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊन मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी त्याला चांगली साथ दिली.

भारताचा पहिला डाव

केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने 94 धावांची आश्वासक आणि संयमी भागीदारी करुन भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र थोडक्यासाठी शतकी भागीदारी हुकली. भारताने 94 रन्सवर पहिली विकेट गमावली. केएलने 98 बॉलमध्ये 46 धावा केल्या. त्यानंतर भारताने ठराविक अतंराने 2 विकेट्स गमावल्या. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल आऊट झाले. यशस्वीने 58 धावा केल्या. तर कर्णधार शुबमन 13 धावांवर बाद झाला.त्यामुळे भारताची 3 बाद 140 अशी स्थिती झाली.

त्यानंतर साई आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने भारताचा डाव सावरला. मात्र 68 व्या ओव्हरमध्ये पंतला दुखापतीमुळे मैदान सोडून बाहेर जावं लागलं. पंत 48 चेंडूंमध्ये 37 धावा करुन रिटायर्ड हर्ट झाला. पंतनंतर साईची साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानात आला. भारताने पहिल्या दिवशी साई सुदर्शनच्या रुपात चौथी आणि शेवटची विकेट गमावली.

भारताच्या 235 धावा असताना साई आऊट झाला. साईने 151 बॉलमध्ये 7 फोरसह 61 रन्स केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 83 षटकांत 4 बाद 264 धावा केल्या.

दुसऱ्या दिवसाचा खेळ

जडेजा आणि ठाकुर जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 92 धावाच जोडता आल्या. रवींद्र जडेजा 20 धावा करुन बाद झाला. शार्दूल ठाकुर याने 88 चेंडूत 41 धावांची चिवट खेळी केली. शार्दुलनंतर भारताचा जखमी वाघ ऋषभ पंत मैदानात आला. चाहत्यांनी पंतचं टाळ्या आणि शिट्ट्यांनी स्वागत केलं. पंतने एकेरी-दुहेरी धाव घेत धावफळक हलता ठेवला. इंग्लंडने या दरम्यान झटके देणं सुरुच ठेवलं. वॉशिंग्टन सुंदर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. वॉशिंग्टनने 27 धावा केल्या. डेब्यूटंट अंशुल कंबोज याला भोपळाही फोडता आला नाही.

त्यानंतर जोफ्रा आर्चर याने पंतला क्लिन बोल्ड केलं. पंतने 75 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्ससह 54 धावा केल्या. यासह पंतच्या झुंजार खेळीचा शेवट झाला. पंतनंतर जसप्रीत बुमराह आऊट झाला आणि भारताचा डाव आटोपला. बुमराहने 4 धावा केल्या. तर मोहम्मद सिराज 5 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर याने तिघांना बाद केलं. तर ख्रिस वोक्स आणि लियाम डॉसन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.