AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..

अर्शदीप सिंगने टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याचा दिलखुलास अंदाज प्रेक्षक आणि चाहत्यांना पाहायला मिळाला. यावेळी त्याने सर्व प्रश्नांनी उत्तर दिली. गौतम गंभीर की गर्लफ्रेंड कोणाची भीती वाटते याचं उत्तरही दिलं.

Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..
Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 24, 2026 | 4:39 PM
Share

Arshdeep Singh, Satta Sammelan: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात उपस्थिती लावली. अर्शदीप सिंगवर यावेळी प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. पण त्याने न डगमगता सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. त्याला लग्न कधी करणार असाही प्रश्न विचारला गेला. इतकंच काय तर, गौतम गंभीर की गर्लफ्रेंड यापैकी सर्वाधिक भीती कोणाची वाटते? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं त्याने दिली. यावेळी त्याच्यासोबत व्यासपीठावर संघ सहकारी अक्षर पटेलही होता. अर्शदीप सिंगने यावेळी भुताचे चित्रपट पाहतानाचा अनुभवही शेअर केला. सत्ता संमेलन कार्यक्रमात सांगितलं की, जेव्हा तुम्ही भुताचे चित्रपट पाहता तेव्हा तुम्ही एकटे नसता, तुमच्यासोबत 2-3 लोकं आणखी असतात. ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही.

अर्शदीप सिंगला सर्वाधिक भीती कोणाची?

अर्शदीप सिंगला सत्ता संमेलन कार्यक्रात सर्वाधिक भीती कोणाची वाटते असा प्रश्न विचारला गेला. तसेच दोन पर्यायही दिले गेले. गौतम गंभीर आणि गर्लफ्रेंड असे दोन पर्याय दिले गेले होते. या प्रश्नाचं उत्तर अर्शदीप काय देईल याची उत्सुकता होती. पण त्याने या दोन्ही पर्यायांना बगल दिली. अर्शदीप सिंगने सांगितलं की, मला फक्त देवाची भीती वाटते, मी सर्वात जास्त त्यांनाच घाबरतो. अर्शदीपने या प्रश्नाचं एकदम स्मार्ट उत्तर दिलं. बऱ्याच लोकांना गौतम गंभीर किंवा गर्लफ्रेंड असं नाव घेईल असं वाटलं होतं. पण त्याने देवाचं नाव घेत, हा प्रश्न देवाकडे नेऊन ठेवला.

अर्शदीप सिंगला या कार्यक्रमात लग्नाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. अर्शदीप सिंग कधी लग्न करणार असं विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, 3-4 वर्षे तरी लग्न करणार नाही. इतकंच काय तर वडिलांना याबाबत स्पष्ट काय ते सांगितलं आहे. मी वडिलांना सांगितलं की, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर हसू दिसावं असं वाटत असेल तर लग्नाच्या गोष्टी करू नका. दुसरीकडे, अर्शदीप सिंगने मोबाईल पाहण्याच्या सवयीबाबतही सांगितलं. अर्शदीप सिंगने सांगितलं की, अक्षर भाई मला मोबाईल पाहण्यापासून रोखतो. हाच धागा पकडून अर्शदीप सिंगने लहान मुलांना सल्लाही दिला. मोबाईलपासून दूर राहा असं त्याने सांगितलं.

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.